भारताच्या शत्रु राष्ट्रांना फुटणार घाम ; सुरक्षा व्यवस्था झाली अजून प्रबळ.

0
35

द पॉईंट नाऊ ब्युरो  ;  भारताची (India) सुरक्षा व्यवस्था आता अजून प्रबळ झाली आहे. त्याला कारण देखील तसेच विशेष. एक खास ताकद आता भारताच्या ताफ्यात दाखल झाली आहे.

कोणत्याही देशासाठी त्यांची सुरक्षा (Security) व्यवस्था ही अधिक महत्वाची असते. तशी ती भारतासाठी देखील आहेच.

आणि भारत देखील आपली सुरक्षा व्यवस्था अधिक प्रबळ करण्या साठी प्रयत्न करत असतो.

आता भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या ताफ्यात ‘INS विशाखापट्टणम’ (INS Visakhapatnam) ही नवीन युद्धनौका दाखल होणार आहे. जीची क्षमता ही नक्कीच अचंबित करणारी आहे.

ही एक स्वदेशी युद्धनौका आहे. जी भारताच्या विरोधी देशांना नक्कीच धडकी भरवणारी आहे.

कारण, या युद्ध नौकेवरून युद्धजन्य परिस्थितीत विरोधकांवर मिसाईल देखील सोडता येणं शक्य आहे.

ब्राम्होस (Bramhan), बराक(Baraq) यासारख्या मिसाईल या युद्ध नौकेवरून सोडता येऊ शकतात.

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Sinh) यांच्या प्रमुख उपस्थितीत ही युद्ध नौका भारताच्या सुरक्षा यंत्रणेच्या ताफ्यात अर्थात नौदलात दाखल होणार आहे.

या INS विशाखापट्टणम ची विशेषतः पहा

1. एक INS विशाखापट्टणमची लांबी आहे – 163 मीटर.

2. या युद्ध नौकेची रुंदी आहे. – 17 मीटर.

3. या युद्ध नौकेचे वजन आहे. – तब्बल 7400 टन.

4. या युद्ध नौकेचा वेग आहे – 55.56 किलो मीटर प्रति तास.

5. तर या युद्ध नौकेस चार वेगवेगळ्या गॅस टरबाईन इंजिन मधून शक्ती मिळत असल्याची माहिती मिळतेय.

ही युद्ध नौका मुंबई येथील माझगाव डॉक येथे तयार केली गेलेली, पहिली स्वदेशी युद्ध नौका आहे.

या युद्ध नौकेवरून ब्राम्होस क्षेपणास्त्र, बराक क्षेपणास्त्र सोडता येत असल्याने, शत्रूची विमानं, क्षेपणास्त्र क्षणात नष्ट केली जाऊ शकतात. तर या युद्ध नौकेवर दोन हेलिकॉप्टर देखील असणार आहेत.

या युद्ध नौकेच्या नौदलाच्या सुरक्षा यंत्रणेत दाखल होण्याने, नौदलाची आणि अर्थातच भारताची सुरक्षा यंत्रणा अधिक प्रबळ होणार आहे.

भारताची सुरक्षा यंत्रणा आधीच शक्तिशाली सुरक्षा यंत्रणेत गणली जाते.

आणि आता त्यात अधिकाधिक प्रबळ युद्ध सामग्रीची भर पडत असल्याने, भारताची सुरक्षा यंत्रणा अजून भक्कम होत चालली आहे.

या युद्ध नौके व्यतिरिक्त अजून तीन युद्ध नौका भारताच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

जे शत्रू पक्षासाठी अतिशय विनाशक ठरतील.

यामुळे साहजिकच भारताच्या विरोधी देशांना घाम फुटणार आहे, हे नक्की.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here