द पॉईंट नाऊ ब्युरो ; आज भारताला अभिमान वाटावा असा विजयश्री भारताने काखेचून आणला आहे. टी 20 विश्वचषक स्पर्धेत महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाने स्कॉटलंडचा आठ गडी राखून विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने सेमीफायनलमध्ये पोहचण्याची आशा अजूनही जिवंत ठेवली आहे. भारताचा आजचा परफॉर्मन्स अभिमानास्पद होता. मात्र हाच आत्मविश्वास खेळतांना पाकिस्तान सोबत असता तर आज भारताचे स्थान वेगळे असते.
आज झालेल्या सामन्यात स्कॉटलंडने भारतासमोर विजयासाठी 86 धावांचं लक्ष ठेवले होते. भारताला उपान्त्य फेरी गाठण्यासाठी हा सामना मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक होते. हेच लक्ष्य समोर ठेऊन मैदानात उतरलेल्या रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि के एल राहुलने (KL Rahul) पहिल्या षटकापासूनच धडाकेबाज फलंदाजी केली. यामुळे भारताला विजय खेचून आणने शक्य झाले.
या जोडीने पहिल्या विकेटसाठी 5 षटकात 70 धावांची पार्टनरशिप केली. रोहित शर्मा 30 धावांवर बाद झाला त्याने 16 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकार मारत 30 धावा केल्या. तर केएल राहुल 50 धावांवर बाद झाला. अवघ्या 19 चेंडूत राहुलने 3 षटकार आणि 6 चौकार मारत वेगवान अर्धशतक ठोकलं
यानंतर विराट कोहली आणि सुर्याकुमारने 7 व्या षटकात भारताचा विजय साकारला . सुर्यकुमारने षटकार ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केले. यामुळे हा विजय भारतीय फॅन्स साठी आनंद देणारा असला तरी पाकिस्तान ने केलेला पराभव हा मात्र अजूनही जिव्हारीच आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम