भाजपाचे 2 शिलेदार बिनविरोध ; ‘राष्ट्रवादी’ सुचकांमुळे ‘तोंडघशी’

1
42

संपादकीय
द पॉईंट नाऊ : देवळा नगरपंचायत रणधुमाळीत भाजपाने दोन उमेदवार बिनविरोध करत बाजी मारली आहे. वार्ड क्रमांक 14 मध्ये भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचे बंधू संभा आहेर यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर वार्ड क्रमांक 17 मध्ये शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष जे भाजपवाशी झालेले, मनोज आहेर हे देखील बिनविरोध झाले आहेत.

भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी काल सेनेला चेकमेट केलं तर राष्ट्रवादीला आज चेकमेट केले. तालुक्यातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी उभी आहे, मात्र कुठल्याच बड्या नेत्याने आपल्या घरातील उमेदवार मैदानात उतरलेला नाही. आता त्या नेत्यांकडे उत्तर असतील की काही वॉर्ड राखीव झालेत त्याठिकाणी आमचे घरातील उमेदवार असतील मात्र याला अर्थ नाही. राष्ट्रवादीने मैदानात उतरण्या आधीच हार मानली की काय अशी चर्चा सर्वत्र आहे. नेत्यांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव कुठलेही अंदाज न घेता उभे केलेले उमेदवार राष्ट्रवादीच्या दृष्टीने तालुक्यासाठी धोक्याची घंटा आहे. तालुक्यात राष्ट्रवादी स्वतःला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून घेत असेल तर वॉर्ड 14 मध्ये निवडणूक बिनविरोध होण हे नेमकं कशाचं द्योतक आहे. जर राष्ट्रवादीला सूचक मिळत नसतील तर इतकी वाईट परिस्थिती कुठलीच नसेल, गेल्यावेळी ज्योत्सना आहेर यांच्याविरोधात अश्विनी आहेर ह्या मैदानात उतरल्या होत्या, त्यांना डोळ्यासमोर पराभव दिसत असताना देखील एक सक्षम विरोधकाची भूमिका त्यांनी बजावली हेच लोकशाहीसाठी अभिप्रेत आहे.

बारामती सारख्या मतदारसंघात विरोधकांना सूचक मिळतात पंतप्रधानांच्या मतदारसंघात विरोधकांना सूचक मिळतात, मग राष्ट्रवादीला या तालुक्यात एक सूचक मिळू नये यासारखी लाजीरवाणी गोष्ट कुठलीच नाही. भाजपाने विरोधकांची लक्तरे वेशीवर टांगली आहेत, मैदानात उतरणे आधीच आपल्या बाजूला दोन उमेदवार आहेत. यामुळे भाजपाच्या अन्य उमेदवारांचा आत्मविश्वास वाढला असून ते जोमाने कामाला लागले आहेत, तर दुसर्‍या बाजूला काल सेनेचा शहराध्यक्ष भाजपच्या गळाला लागल्याने विरोधकांचे खच्चीकरण झाले.

विरोधकांना आत्मपरीक्षणाची वेळ नक्कीच आली आहे, सर्वसामान्य जनतेत विरोधकांची प्रतिमा फारशी सकारात्मक नाही, याला कारण विरोधकांची धरसोड वृत्ती ही देखील आहे. राष्ट्रवादीने गेल्या पाच वर्षात नगरपंचायत कुठलीही विशेष मागणी केलेली नाही, किंवा कधीही सभागृह बंद पाडले नाही. याचा अर्थ विरोधक एक तर भाजपाला शरण आहेत, किंवा भाजपाने इतका विकास केलाय की विरोधकांना मुद्दा देखील सापडत नाही, यापैकी एक अर्थ नक्की आहे. गेल्या पंचवार्षिक ला पक्षविरहित आघाडी असली तरी राष्ट्रवादीचे काही उमेदवार ही विरोधी आघाडीतील होते यामुळे त्यांनी आवाज उठवणे गरजेचे होते, मात्र असं काहीही घडलेले नाही. लोकशाहीमध्ये सत्ताधाऱ्या बरोबरीनेच विरोधकही सक्षम असणे गरजेचे आहे. कुठली भूमिका न घेणे यामुळे जनमानसात नकारात्मक भावना निर्माण होते याचा विचार प्रत्येक राजकीय पक्षाने करणे गरजेचे आहे. विरोधक संपले की त्यांना संपवले गेले याचाही विचार होणे गरजेचे आहे. निवडणूका येतात जातात मात्र या लोकशाहीच्या उत्सवात लढणे गरजेच असतं मैदानातून तलवारी म्यान करून पळण्यात अर्थ नाही, हे लोकशाहीसाठी मारक आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here