द पॉईंट नाऊ ब्युरो : एक भयंकर असा प्रकार समोर आला आहे. बळी देत असतांना बोकडाऐवजी बोकड पकडणाऱ्या माणसाचीच मान कापली गेली.
आंध्रप्रदेश राज्यात चितूर येथे हा भयानक प्रकार घडला. संपूर्ण भारतात जवळपास सर्वच ठिकाणी देवाला बळी देण्याची प्रथा आहे. ज्यात एकतर बोकडाचा किंवा कोंबड्याचा बळी दिला जातो. आंध्रप्रदेश येथे असच बळी देतांना एका व्यक्तीने बोकडाऐवजी बोकड पकडणाऱ्या व्यक्तीचीच मान कापली. यामुळे सदर व्यक्तीचा हृदयद्रावक मृत्यू झाला.
बळी देतेवेळी बोकड कापायला आलेला व्यक्ती हा दारूच्या नशेत होता असं सांगितलं जात आहे. संबंधित व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. या प्रकारामुळे संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम