फक्त ‘कांदा’ नव्हे शेतकऱ्यांची स्वप्नही भिजली तालुक्यात शेतकऱ्यांची दैना

0
35

देवळा प्रतिनिधी : देवळा तालुक्यातील खर्डेसह परिसरातील कणकापूर, शेरी, वार्शी, कांचणे व हनुमंतपाडा याठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे कांदा, द्राक्ष आदींसह रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी ,अशी मागणी प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव यांनी केली आहे .

अवकाळी पावसामुळे खर्डे येथील शेतकरी कृष्णा जाधव यांच्या यांच्या शेतातील भिजलेला कांदा

गेल्या दोन तीन दिवसांपासून संपूर्ण देवळा तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हाता तोंडाशी आलेले पीक नेस्तनाबूत झाले आहे. आधीच सातत्याने वातावरणातील बदलामुळे शेतकरी वर्ग मोटाकुटीस आलेला असतांना त्यात अवकाळीचा शिरकाव या दुहेरी तिहेरी संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गावर आता आर्थिक संकट उभे ठाकले आहे . महागडी कांदा बियाणे घेवून रोपवाटिका तयार करून लाल कांद्याची लागवड केली आहे. तसेच उन्हाळ कांद्याची लागवड योग्य रोप या अवकाळी पावसामुळे खराब झाली आहेत . तर तयार लाल कांदा शेतात भिजल्याने शेतकरी हतबल झाला आहे .

वाढत्या महागाईने आधीच बेजार झालेल्या शेतकऱ्यांवर अवकाळीचे संकट कोसळले . प्रशासनाने याची दखल घेऊन नुकसानग्रस्त शेती पिकांचे पंचनाने करून भरपाई द्यावी ,अशी मागणी शेवटी प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, शिवसेनेचे विभागप्रमुख विजय जगताप आदींनी केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here