द पॉईंट नाऊ ब्युरो : ‘झरून पहावे मरून पहावे दगडावर का होईना एकदा प्रेम करून पहावे….!’ या ओळी आपल्या कानावर पडल्या असतीलच मात्र प्रेम हा शब्द पवित्र राहिलाय की बदनाम झाला हा देखील संशोधनाचा भाग आहे, प्रेम अनेक घटनांनी बदनाम झाले असले तरी, प्रेमाइतकी सुंदर आणि सुरेख बाब अस्तित्वातच नाही. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रेम नाही, त्या व्यक्तीचं जगणं कस भकास, वाळवंटच म्हणावं ! जिच्यावर किंवा ज्याच्यावर प्रेम जडते, त्यावेळी प्रेमाची वाट बघणं, त्या विचारात अडकून राहाणे येतंच ! याशिवाय प्रेम हे कथा-कादंबऱ्या, सिनेमा यात म्हटल्यासारखं उदात्त वगैरे प्रकारात मोडणारं हवंच, अशीही आपली एक अट असते त्या प्रेमात एकनिष्ठता हवी, एकावेळी अनेक मुलींवर किंवा मुलांवर प्रेम करणारे ‘बाजारू प्रेमी’ कमी नाहीत. प्रेम निःपक्ष अन निस्वार्थी प्रेम ‘अनकंडिशनल लव्ह’साठी वास्तविक किती तरी ‘कंडिशन्स’ असतातच यामुळे प्रेमाचा रंग ‘बेरंग’ होत असतो.
कितीही नाकारले तरी आयुष्यात कुठलीही व्यक्ती एकदा मनापासून प्रेमात पडत असते, प्रेमाची व्याख्या आपल्याला अनेकजण विचारत असतात, ती व्याख्या मांडणे तसे सोपे नाही, अनेक मुला मुलींच्या, प्रेमात पडूनही एखादा भंगरी मुलगा जेव्हा एका ठिकाणी येऊन थांबतो अन तिच्यात अडकतो त्यासाठी ती मुलगी ‘खास’ बनत असते तो त्या व्यक्तीची वाट पाहात थांबलेला असतो. आयुष्यभर.. कायम ! की जिच्यावर जीव जडला ती / तो अचानक स्वप्नातून सत्यात अवतरेल , आपल्याला आपलंसं करून प्रेमाची मिठी मारेल, ती नेहमी आपल्या हक्काची असेल आणि आपल्या प्रेमात आकंठ बुडालेली राहील, कायम ती आपलीच असेल. आपणही तसेच प्रेमाच्या भरलेल्या या सागरात कायमचे तरंगत राहू असे असंख्य स्वप्न पाहणारे अशक्य असलेलं स्वप्न सत्यात उतरण्याची वाट पाहणारे ! पुढे जाऊन अधुरे राहून जातात… जेव्हा आयुष्याचे सात फेरे घेण्याची वेळ येते तेव्हा मात्र प्रेम करतांना जात धर्म न बघणारे नंतर या सगळ्या पार्श्वभूमीवर जात अन धर्म आडवा येत असतो कौटुंबिक होणारा विरोध हे सर्व बघता सामोपचाराने प्रेमी दूर होतात अन सुंदर आयुष्य नंतर विस्कटलेले बनत असते, ज्यावेळी वेगळे होण्याची चाहूल लागते प्रेमी एकमेकांत भांडत असतात अविश्वास निर्माण होत असतात, एकमेकांना गमावणार हे माहिती असून देखील गमावण्याची भीतीने होणारे वाद दोघांच्या निखळ प्रेमाच्या एकमेकांच्या मनात गैरसमजांचे वादळ घोंगावत असते.
प्रेम म्हणजे नेमकं आपल्याला त्यात काय हवं असतं बर ? खरं तर ते दुसऱ्याकडून नाहीच, आपल्याचकडून हवं असतं. स्वत:विषयी सतत छान वाटणं, ते न संपणं. आपल्या सर्व गुणदोषांची उजळणी होण्यापेक्षा, त्यातल्या चांगुलपणाला अधोरेखित करत आपलं सहजगत्या पुढे जाणं, त्याचा कोणाला तरी खूप अभिमान वाटणं, आपल्याबरोबर सदैव असण्याची प्रबळ मनोमन इच्छा असणे , जिथे आपल्याला आधाराची गरज आहे आयुष्याच्या वाटेवर अडकल्यासारखं वाटेल तिथे वाटाडय़ा म्हणून त्याने सोबत असणं, आत्मविश्वास, स्वत:ची अस्मिता, प्रेम हे आपल्याला हवंहवंसं वाटत असेल तरी त्यात निर्बंध हे भयानक असतात, आपण कोणावर काळजी पोटी निर्बंध लादत असलो तरी त्याचे परिणाम विपरीत होत असतात. आपल्याला हवं तसं प्रेम करू देत नाही वागू देत नाही, संशय घेतो म्हणून अनेक प्रेमी दुभंगून जातात, जी व्यक्ती त्या प्रेमाचा ताकदवार प्याला हवा तसा पिता यावा म्हणून अपार कष्ट सोसत असते, त्या आपल्यातल्या स्वत:वरही तसंच आणि त्याच वेळेस, तितकंच प्रेम करायला हवंच की! तशी अपेक्षा आपल्या जोडीदाराला असतातच न त्या गैर आहेत असेही नाही. एखाद्या दिवशी आपल्या प्रियेसी किंवा प्रियकरासोबत ‘डेट’वर जायचंय तर तो संपूर्ण दिवस कसा भिरभिरलेला असतो. आज काय घालू , कसं बोलू , कुठे फिरायला जाऊ , गिफ्ट काय देऊ अशा असंख्य प्रश्नांनी काहूर माजत असत महत्त्वाचं म्हणजे त्या कोण्या एका व्यक्तीला, आपल्याशी परत बोलावंसं, भेटावंसं वाटेल असं काय करू ? कितीही मैत्रीपूर्ण नातं असेल तरी वागण्या-बोलण्यात सहजता, एकमेकांना खूपसं ओळखत खूप वाटा तुडवून झालेल्या असतील, तरीही ही प्रेमळ ‘अंधूकसर’ धाकधूक असतेच हो ! आणि पहिली भेट ही अविस्मरणीय करण्यासाठी सर्वच प्रेमी आसुसलेले असतात.
प्रेम म्हटलं की वाद येतच असतात ते म्हणतात न भांड्याला भांडे लागत असते ‘माझंच त्याच्यावर जास्त प्रेम आहे. मी नेहमी वेळेत भेटतो भेटायला वेळेवर येतो. तो मात्र कायमच उशिरा येतो. मला घरात किती, काय काय थापा मारून निघावं लागतं. आता चिडचिड होते माझी.’ आधी नव्हता तो / ती असा, असे असंख्य वादाची तरंग उडत असतात. एकदा प्रेमात पडलं की, आपलं व्यक्तिगत असं काही उरतच नाही सर्व काही बँकेच्या जॉईन अकाउंट सारखे होत असते. सर्व एकमेकांना शेअर करावेच लागते शेअर नाही झाले तर गैरसमज अन दुरावा निर्माण होत असतो त्यामुळे या प्रेमाच्या रंगाला फार जपावे लागते.
तिच्या लग्नानंतर ‘माझं ब्रेक-अप झाल्याने मला जगावंसं वाटत नाहीये. काहीच इंटरेस्टिंग वाटत नाही, कारण या एका रिलेशनशिपमध्ये मी माझं सगळं दिलेलं. त्याच्याआधी मला काय आवडायचं, दिवस कसा असायचा, काय केलं जायचं, हे अक्षरश: समजत नाहीये. त्यामुळेच एक पोकळी आलीये.’ असा विचार अनेक प्रेमींच्या मनात हेत असतो
अशी अनेक उदाहरणं आपण पाहिली की वाटतंच, प्रेम इतकं सुंदर असेल तर त्यात इतका त्रास का आहे किंवा मनावर इतकं दडपण, ताण नको आणि मुळात स्वत:चं व्यक्तिमत्त्व पार पुसून जाईल किंवा विस्मरणातच जाईल, तरीही खूप समाधान आहे, याची गंमत अशी, की हे सगळं करताना, घडताना ते असं होत जातं, सहज. सुरुवातीला निरपेक्ष, आपल्याला आवडतं म्हणून. मग, आपण आत्तापर्यंत करतोय म्हणून. मग येतो तो हिशोब! मी इतकं केलं, असं केलं, तसं केलं आणि मग येते ती प्रेमात असूनही जाणवणारी पोकळी, अर्थहीनता आणि कधी कधी चक्क कंटाळा. नातं पुढे सरकतं तशा काही बाबी अटळच की. तरीही त्या याच मार्गाने जाव्यात हे गरजेचं नाही.
‘आपलं दोघांचं’ म्हणून असणारं जे काही आहे, त्यातल्या काही गोष्टींचा त्याग आपसूक आलाच! तसा ‘त्याग’ करण्यात काही चूक नाहीये, हे त्याच वेळेस मनात कोरलं जाईल, जेव्हा आपलं सर्वात आधी आपल्या स्वत:वर अफाट प्रेम असेल. शिवाय यातून केवळ स्वत:चाच स्वार्थीपणानं विचार करतोय का, वगैरे भंपक प्रश्नही समोर येणार नाहीत. आपल्या आसपासच्या कुणीही उगाचच आपली मजाक घेत, ‘तुला प्रेमच करता येत नाही! तू प्रचंड स्वार्थी आहेस!’ असलं काही भलतंसलतं डोक्यात भरवण्याचा कसोशीनं प्रयत्न केला तरीही आपण स्वत:शी प्रामाणिक असू, आश्वस्त असू तर याकडे सहजच दुर्लक्ष करता येतं.
प्रेम बदनाम का झाले …?
प्रेम पवित्र आहे म्हणून गाजावाजा करणारे आता मात्र प्रेम कस वाईट आहे हे पटवून सांगताय, प्रेम वैगरे काही नसतं अंधश्रद्धा आहे ही सर्व आभासी दुनिया आहे असं चित्र निर्माण झाले आहे, नुकतेच देवळा तालुक्यात चक्क प्रियसीने आपल्या प्रियकराला जाळले आहे, अशी धक्कादायक घटना घडली ज्या पोरीने व्हॅलेंटाईन साजरा केला असेल तिनेच अंगावर पेट्रोल ओतून काडी लावली अन त्याला संपवले याचा अर्थ हे खरंच प्रेम होतं की तत्कालीन आकर्षक हा प्रश्न आता उपस्थित राहतोय.
यासर्व घटना महाराष्ट्रात घडत असल्याने प्रेम मात्र बदनाम झाले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम