पुढील 48 तास शेतकऱ्यांसाठी वैऱ्याचे ; मुसळधार पावसाचा इशारा

0
168

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; गेल्या महिन्यात पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी त्या संकटातून सावरत नाही तोच पुन्हा वाईट बातमी समोर आली आहे. राज्यातून मान्सून पुर्णपणे परतला (Monsoon withdrawn) आहे.

मान्सून गायब झाल्यानंतर आता राज्यात किमान तापमानात (temperature in maharashtra) किंचित घट झाली असून अनेक ठिकाणी गारवा जाणवत आहे. पण मुंबईत अद्याप दमट आणि गरम हवामानाची नोंद करण्यात आली आहे.

हे सर्व होत असतांना पुढील 48 तासांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा (Rain in maharashtra) इशारा देण्यात आला आहे. आज विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.

नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, बुलडाणा, जालना, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोली अशा एकूण अठरा जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी केला आहे.

काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या तज्ज्ञांकडून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सध्या बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे हा दाब अजून तीव्र बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओडिशाच्या किनारपट्टीवर जोरदार पाऊस धडकण्याची शक्यता आहे. याचा परिणाम थेट महाराष्ट्रात जाणवणार आहे, विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार आहे. उद्याही राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मात्र राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here