द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : देवळा तालुक्यातील ग्रामीण भागात भागात रस्त्यांची दुर्दशा फारच दुर्दैवी आहे. रस्त्यावर डांबर तर नाहीच मात्र आता रस्त्यांच्या कडेला असलेले झाडे झुडप्यांनी निम्मी रस्ता व्यापला आहे. मुलूकवाडी खर्डे भागात तर रस्त्यांची परिस्थिती फारच विचित्र आहे. रस्त्यावर प्रवास करतांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय.
मुलूकवाडी येथील रस्त्यावर डांबरीकरणं राहिलेले नाही. त्यात झुडपांनी केलेलं अतिक्रमण आहेच मात्र काही स्थानिक नागरिकांनी रस्त्यांच्या कडेला दगड टाकल्याने रस्त्यावर प्रवास करतांना अनेक अडचणी निर्माण होताय. काल दिवसभरात दोन अपघात होता होता थोडक्यात बचावले, तर अरुंद जागे मुळे एका बाईक चालकाच्या पायावर ट्रकटरचे चाक गेल्याने दुखापत झाली आहे.
प्रशासन मात्र सुस्त ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने ना पुढाऱ्यांनी लक्ष दिले न प्रशासनाने यामुळे नागरीकांनी कोणाकडे लक्ष द्यावे हा प्रश्न उपस्थित होत आहे.
या रस्त्यावरून आमदार ,खासदार , जिल्हापरिषद सदस्यांनी चक्कर मारावे जेणेकरून समस्यांची जाणीव नेत्यांना होईल अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम