द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : महापालिका प्रशासनाचा कारोभाराला सुरुवात झाली की मूलभूत गरजा म्हणजेच पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि उद्यान अशा सुविधा मिळणार असे मनात आले होते. सारसबाग, राजीव गांधी उद्यान, पेशवे उद्यान, संभाजी उद्यान अशी काही मोजून उद्याने प्रचलित आहेत. परंतु, उद्यान म्हणजे काय , असा टोचणारा प्रश्न पुढील काही गावातील नागरिकांनी विचारला आहे.
पिसोळी, हांडेवाडी, उंड्री, औताडेवाडी, वडाचीवाडी, होळकरवाडी या गावात साधी उद्याने नाहीत. मुळात पिण्यासाठी पाणी मिळत नाही, लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान जिथे नाही, तिथे उद्यान, सांस्कृतिक केंद्र अशा सुविधा तर आमच्यापासून कोसावरच
उद्यान, पाणी, रस्त्यावरील दिवे, रस्ते अशा गरजेच्या सुविधा पाहण्यासाठी प्रशासनाने किमान दुर्बीण द्यावी म्हणजे पाहता येतील, अशी खोचक विचारणा उंड्रीतील खंडेराव जगताप यांनी केली.
महमंदवाडीतील काळेबोराटेनगर येथे स.नं.४८ मध्ये स्व. गोपीनाथ मुंढे उद्यानाचे उद्घाटन २०१८ साली करण्यात आले. त्यानंतर उद्यानाची सीमाभिंत व जॉगिंग ट्रॅक बनविण्यात आला. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे उद्यानाची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे. उद्यानामध्ये गवत आणि बाभळीची झाडे वाढली आहेत. वीस वर्षांपूर्वी महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर २०१७ स्व. गोपीनाथ मुंढे उद्यान विकसित करण्याचा आरंभ झाला. मात्र, या उद्यानामध्ये अद्याप रस्त्यावरील दिवे बंद अवस्थेत, स्वच्छतागृह बंद आहे, पिण्याचे पाणी नाही, व्यायामाचे साहित्य नाही, बसण्यासाठी बाकडे नाही.
पालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे म्हणाले आहेत की, उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागिल दोन वर्षे कोरोनामुळे सर्वच कामे थांबली गेली होती. आता कामे सुरू झाली आहेत, टप्प्याटप्प्याने उद्यानांचाही विकास होईल, असे त्यांनी सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम