वासिंद, प्रतिनिधी : कल्याण तालुक्यातील पळसोली गावाच्या वनविभाग हद्दीतील जागेमध्ये पर्यावरण उत्कर्ष बहूउद्देशीय संस्थेच्या ठाणे जिल्हा कार्यकारिणीतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष विजय चोघळा यांच्या मार्गदर्शनात गुरूवारी(ता.19) पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण पार पडले.

यावेळी चिंच, पिंपळ, आवळा, बेहडा, आदी देशी जातीच्या एकूण 100 झाडांची लागवड करून संस्था सदस्यांनी या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली. यावेळी खडवली रेंजचे वनाधिकारी राजू शिंदे यांनी वृक्षारोपण, संवर्धन व हरितक्रांतीचे महत्व विशद केले कार्यक्रमासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील, संभूदूर्ग प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदेश चौधरी, वनाधिकारी राजू शिंदे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे जिल्हाअध्यक्ष दिनेश चौधरी, सचिव प्रदीप चव्हाण, कार्याध्यक्ष शेखर लोणे, संपर्क प्रमुख भगवान तारमळे, प्रसिद्ध प्रमुख प्रशांत जाधव, कल्याण तालुका अध्यक्ष रुपेश पितांबरे, उपाध्यक्ष नंदकुमार दिवाणे, शहापूर तालुका अध्यक्ष सचिन ढमणे, सचव युवराज तिवरे, भिवंडी तालुका अध्यक्ष सचिन पाटोळे यांच्या सह वनविभाग कर्मचारी उपस्थित होते. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी खडवली वनविभागाने व परिसरातील ग्रामस्थांनी उत्तम सहकार्य केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम