नितेश राणे शरण या ; अटक ‘अटळ’

0
30

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : राणेंच्या अडचणी वाढल्या असून संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज आज फेटाळला आहे. सरकारी वकील सिंघवी म्हणाले की CDR मध्ये पुरावे सापडले आहेत. नितेश राणे 8 मोबाईल वापरत होते.

आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला असून नितेश राणे यांना येत्या १० दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास सांगितले आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांच्या वकीलाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिथेही निराशाच पाहायला मिळाली. त्यानंतर अखेर नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. त्याचा आरोप शिवसेनेने भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर लावला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here