नाशिक निफाड औरंगाबाद महामार्ग मृत्यूचा सापळा 

0
44

प्रसाद बैरागी
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; मरणकळा सोसत असलेल्या नाशिक निफाड औरंगाबाद महामार्गाच्या दुरुस्तीसाठी आता थेट जनहित याचिका दाखल करण्यासाठी नोटीस प्रसिद्ध केल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग विरुद्धचा संताप नागरिकांमधून उफाळून आला आहे.

नाशिक औरंगाबाद महामार्गाच्या पिंपळस,निफाड पासून वैजापूर हद्दीपर्यंत हा महामार्ग पूर्णतः उध्वस्त झाला आहे,दिड ते दोन फूट खड्डे मार्गावर अनेक ठिकाणी पडल्याने गेल्या तीन वर्षात अपघात होऊन काहींचा जीव गेला तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बी ओ टी विभागाकडे या रस्त्याची जबाबदारी असून त्यांचे पूर्ण दुर्लक्ष आहे ,हे दुर्लक्ष असल्याने या मार्गावरील विविध व्यावसायिकानी वाटेल तशा प्रकारे दुभाजक तोडले असून यामुळेही अपघात झाले आहेत

15 वर्षांपूर्वी छगन भुजबळ हे येवल्याचे आमदार झाल्यानंतर त्यांनी या मार्गाचे चौपदरीकरण करून दर्जेदार रस्ता तयार केला पण मागील 5 वर्षाच्या काळात या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले, बांधकाम विभागाच्या अनास्थेने या रस्त्याची वाट लागली आहे.सध्या या रस्त्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने निफाड कोर्टातील तरुण वकील समीर भोसले यांनी सामाजिक भावनेतून

सार्वजनिक बांधकाम विभागाला  किंवा शासनाला जागे करण्यासाठी न्यायालयाच्या माध्यमातून प्रतिनिधिक स्वरूपात जनहित याचिका दाखल करत आहे व या जनतेच्या कामासाठी त्यांच्या मदतीला  अनिल पाटील कुंदे, शिवसेना युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे यांनी मिळून शासनाच्या व सार्वजनिक बांधकाम विभागा विरोधात न्यायालयीन लढाई सुरू केली आहे यासाठी जनतेच्या अपेक्षित सहभागासाठी नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन करीत यासाठी नोटीस प्रसिद्ध केली आहे.

मृत्यूचा सापळा असलेल्या या रस्त्यासाठी आता नागरिकांना न्यायालयात जाण्याची वेळ आल्याने शासन व प्रशासनाची अब्रू अक्षरशः वेशीला टांगली गेली आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here