नातेवाईकच निघाला वैरी ; चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

1
45

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी  ;  अत्याचार करणाऱ्याच्या विकृतीला काहीही सीमा नसते. अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे एका चार वर्षांच्या लहानग्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

या घटनेतील संबंधित विकृत हा त्या लहानग्या मुलीचा नातेवाईक असल्याचं सांगण्यात येत आहे.

चाळीसगाव येथील आनंदवाडी भागात हा संतापजनक प्रकार घडला आहे.

देशात मागच्या काही काळात अत्याचार केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

या घटना अजून ही थांबलेल्या नाहीत. यामुळे देशभर नागरिकांमध्ये संतापजनक वातावरण आहे.

पुरुष आणि स्त्री या दोन घटकांमध्ये स्त्री ला केवळ उपभोगाची वस्तू म्हणून पाहणाऱ्या विकृत प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्याचे दिसून येत आहे.

त्यात मागील बऱ्याच घटनांमध्ये विकृत व्यक्तींच्या भयावह अशा कृतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ज्यात संबंधित विकृताद्वारे पीडितेवर भयावह असे पाशवी अत्याचार करण्यात आले.

विकृत व्यक्ती आपल्या वासनांध प्रवृत्तीला पुरे करण्यासाठी कोणत्याही थराला पोहोचू शकतो, हेच आत्ता पर्यंत दिसून आले आहे.

चाळीसगाव येथील या घटनेत संबंधित नातेवाईक याने पीडित चार वर्षीय लहानग्या मुलीला खाऊचे नाव सांगत, निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

यातील या विकृत व्यक्तीला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे.

या अशा प्रकारच्या वाढत्या घटनांनी पूर्णतः हादरवरून टाकले आहे. या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढच होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

 

ही बातमी वाचलीत का?

– 100 कोटी वसुली प्रकरण

– राज्याच्या गृहमंत्र्यांवर आरोप

– गृहमंत्र्यांचा राजीनामा

– पोलीस अधिकारी अटकेत

– आरोप करणारे पोलीस आयुक्त फरार घोषित

– सर्वोच्च न्यायालयाचे अटकेपासून संरक्षण

– पोलीस आयुक्त संरक्षणानंतर चौकशीसाठी हजर

हा घटनाक्रम आहे महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात सुरू असलेल्या 100 कोटी (100 Crore) वसुली प्रकरणाचा.

महाराष्ट्रामध्ये तत्कालीन गृहमंत्री (Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आदेश दिल्याचे आरोप करण्यात आले.

याबाबत लेटर बॉंब फोडला तो मुंबई (Mumbai) चे पोलीस आयुक्त (Police Commissioner) परमबीर सिंह (Parambeer Sinh) यांनी. या प्रकरणाच्या चौकशीस सुरुवात झाली. आणि पोलीस आयुक्त परमबीर सिंह मात्र गायब झाले.

परमबीर सिंह यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) फरार घोषित केले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) अटकेपासून (Arrest) संरक्षण मिळाल्या नंतर आता परमबीर सिंह मुंबईत दाखल झाले आहेत.

पुढील माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा..

आता या प्रकरणाचा निकाल लागणार?


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here