नागरिकहो सावधान! राज्यात उष्माघाताचा अजून एक बळी

0
37

द पॉईंट नाऊ ब्युरो : राज्यात उष्णतेचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. उष्माघातामुळे आधी एकाच्या मृत्यूनंतर आता अजून एका जणाचा मृत्यू झाला आहे. उस्मानाबादमध्ये एका शेतकऱ्याचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे.

उस्मानाबाद येथे लिंबराज सुकाळे हे शेतात गेलेले होते. शेतातील कडबा बांधून ते पाणी पिण्यास गेले होते. मात्र पाणी गडबडीत पीत असताना त्यांचा जागीच मृत्यू झाला.

उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील हसेगाव येथील लिंबराज सुकाळे यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. राज्यात याआधी जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यात उष्माघातामुळे एकाला आपला जीव गमवावा लागला होता.

राज्यात वाढत्या उष्णतेने नागरिकांच्या जीवाची लाही-लाही होत आहे. त्यामुळे सर्वांनी काही कारण नसेल, तर दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात बहुतांश ठिकाणी उन्हाचा पारा हा 40 अंशांच्या वर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here