देशात दुसऱ्या क्रमांकावरील स्वच्छतेत महाराष्ट्रला सर्वाधिक 92 पुरस्कार…

0
169

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्र प्रथमपासूनच अग्रस्थानी आहे. आता तर महापालिका श्रेणीमध्ये प्रमुख तीन पुरस्कार महाराष्ट्राने पटकावले आहेत. या कामगिरीवर मुख्यमंत्री ‘उद्धव ठाकरे’ यांनी सर्व अधिकारी नागरिक आणि नगरसेवकांचे अभिनंदन व्यक्त केले आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छता पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक 92 पुरस्कार पटकावत देशात अव्वल स्थान मिळवले आहे. शंभरहून अधिक नागरी स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशला देशातील अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्वच्छ राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे.

देशात स्वच्छतेत प्रथम आलेल्या छत्तीसगडला मात्र 76 पुरस्कार मिळाले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्राने सर्वाधिक 92 पुरस्कार पटकावले आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने शनिवारी या वर्षी केलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाचे निकाल जाहीर केले

तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये राज्यात सर्वात स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबई ला 10 ते 40 लाख लोकसंख्येच्या देशातील मोठ्या शहरांमध्ये सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान मिळाला आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेला आणखी तीन सन्मान मिळाले आहे. यात सफाई मित्र सुरक्षा आव्हान, अभियानात नवी मुंबई देशातील द्वितीय क्रमांकाचे शहर ठरले आहे.

तसेच कचरामुक्त शहरांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने पंचतारांकित मानांकन कायम राखले आहे. तसेच हागणदारीमुक्त शहरांच्या श्रेणीतील ‘वॉटरप्लस’ या सर्वोच्च नामांकनाने सन्मानित करण्यात आले. हे सर्वोच्च मानांकन मिळवणाऱ्या देशातील 9 शहरांमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here