
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा येथे साहित्य अकादमी व कर्मचारी रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “ग्रामलोक ” कवितापाठ मध्ये ग्रामीण जीवनाची दुःखे,वेदना आणि आकांशा मांडणाऱ्या कवितांचे सादरीकरण देविदास चौधरी, लक्ष्मण महाडिक,एस के पाटील शैलेश चव्हाण यांनी केले.

प्रारंभी प्राचार्य हितेंद्र आहेर यांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवा निमित्ताने ग्रामीण भागातील प्रतिभेचे महत्त्व साहित्य अकादेमीच्या या उपक्रमातून उजळून निघालेचे सांगितले. साहित्य अकदेमी मराठी सल्लागार समितीचे सदस्य एकनाथ पगार यांनी ग्रामलोक या उपक्रमाची व साहित्य अकादेमीच्या कार्याची माहिती दिली.
ग्रामीण भागात साहित्य प्रचार -प्रसार हे ग्रामलोकचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. देविदास चौधरी यांच्या कविता सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील विसंगतीना लक्ष करणाऱ्या होत्या . कवींनी शेतकऱ्यांविरुद्ध कट रचणाऱ्यांच्या कळपात सहभागी होता कामा नये हा आशय ठळक केला. लक्ष्मण महाडिकांनी कुणब्यांच्या आणि स्त्री जीवनाच्या व्यथा उलगडल्या . अहिराणी कवी एस के पाटील व शैलेश चव्हाण यांच्या कविताही शेती, ग्रामीण जीवन आणि राजकीय भोंदूगिरी यावर भाष्य करणाऱ्या होत्या.
अहिराणीच्या नाद सौंदर्याचा आणि अर्थ सौंदर्याची सक्षम भावप्रत्यय देणाऱ्या या कवितांनी सारे वातावरणच देशीयतेने भारावून टाकले. उत्स्फूर्तपणे अड सोमनाथ मुंजवाडकर, रवींद्र देवरे, समाधान भामरे व उदय आहेर यांनी सामाजिक, राजकीय आशयाच्या कविता सादर केल्या .डॉ जयवंत भदाणे यांनी आभार मानले.
प्रोफेसर डॉ मालती आहेर, उपप्राचार्य ए बी पवार, मुख्याध्यापक दिलीप आहेर,मुख्याध्यापिका सौ सागर आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम