
देवळा प्रतिनिधी : पंचायत समिती देवळा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्याकडून भारतीय स्वातंत्र्याचा आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने देवळा तालुक्यातील एकशे अडोतीस महिला बचत गटांना तालुक्यातील बँकांकडून अडीच कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश देशमुख , तसेच बँक ऑफ महाराष्ट्र , बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक , भारतीय स्टेट बँक यांचे शाखा व्यवस्थापक ,तसेच तालुका अभियान व्यवस्थापक मनोज साळी प्रभाग समन्वयक विलास वाळके ,प्रवीण गांगुर्डे ,रेणुका सोनवणे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी तालुक्यातील समुदाय संसाधन व्यक्ती , बचत गटाच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते. सदर तालुक्यातील महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांना व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करण्यात येतो. सध्या भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असल्याने याचे औचित्य साधून देवळा तालुकास्तरीय बँक कर्ज पुरवठा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तालुका अभियान व्यवस्थापक मनोज साळी यांनी केले .
तसेच देश पातळीवर स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत नागरिकांच्या प्रतिक्रिया नोंदणीचे काम सुरू असून याबाबत बचत गटाच्या महिलांना स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मोबाईल नोंदणी बाबत माहिती स्वच्छ भारत अभियानाचे गट समन्वयक महेश भामरे यांनी दिली तसेच जास्तीत जास्त नोंदणी करून व नाशिक जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उंचावण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्यात यावे असे आव्हान केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम