
देवळा : येथील नवीन प्रशासकीय इमारतीत बहुतांश कार्यालये कार्यरत आहेत. परंतु देवळा शहरापासून हे अंतर जवळपास तीन ते चार किलोमीटर आहे. त्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना कागदपत्रे तसेच इतर कामानिमित्त ये-जा करण्यास मर्यादा पडतात.

रिक्षा वा बससुविधा नसल्याने वाहन नसलेल्यांना पायीच चकरा माराव्या लागतात. याबाबत नागरिकांची जुनी मागणी असताना प्रतिज्ञापत्र साक्षांकित करण्यासाठी सुद्धा नवीन तहसील कार्यालयाकडे जाण्याची नामुष्की नागरिकांवर आल्याने असंतोष व्यक्त करण्यात आला. यामुळे येथील काही दिव्यांग नागरिक व महिलांची खूपच हेळसांड निर्माण झाली आहे. त्यांना शारीरिक त्रास, आर्थिक भुर्दंड , वेळेचा अपव्ययआणि उष्णतेचा दाह सहन करत या कामासाठी जुने तहसील ते नवीन तहसील अशा चकरा माराव्या लागल्या.
याबाबत सोय व्हावी अशी मागणी तालुक्यातून आलेले रविंद्र पगार (रामेश्वर), संदीप सोनजे (पिंपळगाव), ज्योती आहिरे (चांदवड), माधवसिंग परदेशी, आनंदा देवरे (उमराने), सोमनाथ आहिरे (वाखारी) आदींनी केली. तशा आशयाचे निवेदन तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना बुधवार (दि.२५) रोजी दिले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम