द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; ऐन दिवाळीच्या तोंडावर गावी जाणाऱ्यांसाठी कदाचित ही धक्का देणारी बातमी ठरू शकते. कारण, एस. टी. कर्मचारी संघटनेने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून याबाबत कळवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मागील काही दिवसांत बऱ्याच एस. टी. कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. वेळेवर वेतन न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. कोरोनाच्या संकटाने एस. टी. महामंडळाचे पूर्णतः कंबरडे मोडले. त्यामुळे उत्पन्नच काही झाले नसल्याने मोठ्या प्रमाणावर एस. टी. कर्मचाऱ्यांचे वेतन थकले. याच कारणास्तव कर्मचाऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
सध्या आधीच इंधनाचे दर वाढल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. त्यात आता एस. टी. कर्मचारी जर संपावर गेले तर सामान्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करावे आणि समस्या सोडवण्याची मागणी एस. टी. कर्मचारी संघटनेने केली आहे. यामुळे आता पुढे काय होते? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर एस. टी. कर्मचारी संपावर गेल्यास त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम