द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : देवळा शहरासाठी रामेश्वर धरणातून नवीन पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहे. मात्र या योजने विरोधात उदयकुमार आहेर यांनी याचिका दाखल केली होती. या सर्व बाबी बघता शासनाने योजनेची चौकशी करण्याचे आदेश दिले तसेच तोपर्यंत कामाला स्थगिती दिली आहे. या योजनेची आज चौकशी होणार असल्याने देवळा शहर वासीयांचे लक्ष लागून आहे. या योजनेवरून आरोप प्रत्यारोप जोरदार सुरू आहेत, सत्ताधारी म्हणतात चांगल्या कामात विघ्न आणण यांचे काम तर, विरोधक म्हणताय हे यांचे ठेकेदारीसाठी उठाठेव , यात मात्र जनतेला गृहीत धरून राजकारण सुरू असल्याचे चित्र आहे.
नविन पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिलेली होती या योजनेची आज चौकशी करण्यासाठी चांदवड प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली इतर तीन कार्यकारी अभियंता यांची चौकशी समिती नेमली आहे. सदर प्रकरणी चौकशी करणेकामी मंगळवार दि.24/08/2021 रोजी सकाळी 11 वा. समिती चौकशी करणार आहे.
उदय आहेर यांच्या मते ही योजना चुकीची असून फक्त पैसे कमवण्यासाठी या योजनेचा वापर आहे. नागरिकांना या योजनेचा अतिरिक्त पाणी पट्टीचा बोजा पडणार आहे. यामुळे शासनाचे इतके पैसे खर्चू नयेत अशी आहेर यांची भूमिका आहे.
सत्ताधारी अतुल पवार , जितेंद्र आहेर यांच्या मते शहराला नवीन होणारी पाणीपुरवठा योजना ही गरजेची आहे, नागरिकांना 24 तास पाणीपुरवठा होईल. आधीच्या योजना शहरासाठी अपूर्ण पडताय , नागरीकांना पिण्याचे पाणी देण्याच्या आड येऊ नये. व राजकारण थांबवावे.
देवळा शहरातील पाण्याचं राजकारण तापले असतांना बाकी पक्षांचे नेते मात्र मुंग गिळून गप्प बसले आहेत. त्यांना स्वतंत्र भूमिका नाही का असा सवाल उपस्थित होतोय. नगरपंचायत निवडणूक तोंडावर असतांना पाण्याचे राजकारण होणार की योग्य निर्णय याकडे सर्व्यांचे लक्ष लागून आहे.
जितेंद्र आहेर यांची भूमिका संशयास्पद ?
साडेचार कोटींची जी पाणीपुरवठा योजना शहरासाठी मंजूर करण्यात आली होती. तेव्हा उपसरपंचपदी जितेंद्र आहेर हे होते, आज आहेर यांनी पक्ष बदलला म्हणून त्यांच्या कार्यकाळात झालेली योजनेवर विश्वास नाही का ? त्यांनी दूरदृष्टीने ही योजना बनवली नव्हती का ? जितेंद्र आहेर यांनी स्वतःच्या कार्यकाळात केलेली योजना चुकीची आहे असं त्यांचं म्हणणं आहे का ? या सर्व बाबींचा खुलासा देवळा शहरवासीयांना होणं गरजेचं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
या नेत्यांना विकास कामांचे कुठलीही देणे नाही फक्त आपली ठेकेदारी तेजीत हवी यासाठी त्यांचा उठाठेव असतो असे पूर्ण तालुक्यातील जनता त्यांच्या दहशतीमुळे उघडपणे सांगू नाही शकत पण जनता दबक्या आवाजात बोलते.
किती लोक दादा नानांच्या किंवा उदय आहेर यांच्या बाजूने बोलता याचाही अकडा (एक्झिट पोल)जाहीर केला पाहिजे
काय करायची डबल सोय हेकेखोर पणा फक्त आपल ते पोरगं ……..
पण लोक बोलणार नाही जसे करतील तसे भरतील