डॉ. भारती पवारांना अद्यापही पराभव मान्य का नाही ? ; मा. खा. चव्हानही गड राखता मात्र मंत्री नाही हे कसलं द्योतक

0
44

नाशिक प्रतिनिधी : केंद्रिंय मंत्री भारती पवार यांचा पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यांचा कळवण या होंग्राऊंडवर झालेला पराभव अद्याप त्यांना मान्य नाही. दारूण पराभवाला सामोरे जावे लागले मात्र ते पराभवाच्या विवंचनेतून आरोप प्रत्यारोप करत आहेत. कळवण मध्ये राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार यांनी दणदणीत यश मिळविले. दिंडोरी लोकसभे अंतर्गत येणाऱ्या सुरगाणा मतदारसंघात भाजपाची मान माजी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण आणि नारायण गावित यांनी राखली अन भाजपचे कमळ फुलविले.

कळवण शेजारील देवळा नगरपरिषदेच्या निवडणुकीत यशस्वी आखलेल्या डावपेचांमुळे केदा आहेर यांनी याठिकाणी 17 पैकी 15 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आणले. नानांच्या विजयाने भाजपा जिल्ह्यात नंबर एकला गेली. तर केंद्रिय मंत्री असलेल्या डॉ. भारती पवार यांना त्यांच्या कळवण नगरपरिषदेत रॅलीनंतर अवघी एकच जागा जिंकता आली. गेल्या वेळेच्या तुलनेत पवारांच्या एंट्रीने एक जागा गमावल्याची चर्चा आहे.

जिल्ह्यातील राजकारण निकालानंतर तापले असतांना यश अपयशावर सर्व चर्चा सुरू आहे. कळवणमध्ये राष्ट्रवादीने मारलेली बाजी आणि त्यामुळे केंद्रीय मंत्री या नात्याने झालेली पिछेहाट डॉ. पवार यांना अद्याप मान्य नाही हे नवलच आहे. प्रगल्भ राजकीय नेतृत्वाचे मात्र हे लक्षण नाही. एका मंत्र्याने आपला पराभव झाकण्यासाठी आपल्या दिराकडे बोट दाखवणे कितीपत योग्य आहे हे अजूनही न उलगडलेलं कोड आहे.
सुरगाण्यात राष्ट्रवादीचे काय झाले हे म्हणत भारती पवार आपले अपयश झाकताय, मात्र सुरगण्यातील विजय हा भारतीय पवारांचा नसून माजी खासदार हरीचंद्र चव्हाण यांचा आहे हे त्यांना आता कोणी सांगावं. बर आपला पराभव झाला याकडे लक्ष देणे सोडून जिल्ह्यात एक नंबर असल्याचा तुणतुणे ते वाजवताय. हे म्हणजे 0 टक्के कर्तृत्व त्या यशात असतांना त्याचा गाजावाजा करणे पवारांना बाकी चांगला जमलं.

त्यांच्या दाव्यात तस तथ्य आहे पण, भाजपाने ज्या काही जागा जिंकल्या आहेत, त्यात जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या देवळ्याच्या निम्म्या म्हणजेच 15 जागा आहेत. उरलेल्या निम्म्या जागांमध्ये भाजपच्या माजी खासदारांसह अन्य नेत्यांनी घेतलेले कष्ट आहेत. सुरगाण्यात मिळालेले यश चव्हाण आणि गावित यांचे आहे. तर दिंडोरीत भाजपला तिसर्‍या क्रमांकाच्या मिळालेल्या जागा ह्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी केलेल्या कष्टाची पावती आहे. मग मंत्री डॉ. पवार यांची कामगिरी नेमकी काय, हा खरा प्रश्‍न आहेच ना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांचा करिष्मा काय आहे.

त्यांच्या करिष्म्यावर दिंडोरीत भाजपाची सरशी अपेक्षित होती तिथे पण पराभव आला. पेठमध्येही यश मिळाले नाही. निफाड नगरपंचायतीमध्ये गेल्यावेळी भाजपची सत्ता होती, त्याठिकाणी यावेळी भाजपचा एकही सदस्य निवडून आलेला नाही. मग हा पवारांचा झालेला दारुण पराभव नाही का ? त्यांना हे अपयश का दिसत नाही. त्यांच्या मतदार संघातील आठ तालुके समाविष्ठ आहे त्यापैकी सर्वच ठिकाणी भाजपाची नाचक्की झाली, देवळा न सुरगाणा वगळता. भाजपाचा विजयाचे शिलेदार जसे जिल्हाध्यक्ष आहेर, चव्हाण, गावित यांच्यासारखे स्थानिक पदाधिकारी आहेत. तसेच पराभवाचे शिलेदार हे डॉ. भारती पवार ह्याच आहेत.

सुज्ञ मतदारांना अजूनही वाटत की भारती पवारांनी जनतेसमोर येऊन आपला पराभव मान्य करावा. जेणेकरून लोकांच्या मनात अजूनही त्यांच्या प्रामाणिक पणाचा जयघोष होईल. अन आत्मचिंतनाने भविष्यात ते यश संपादन करतील.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here