शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रत बाजारपेठेत टोमॅटोच्या दरात वाढ झाली असून आठवड्याच्या तुलनेत दुप्पट दराने टोमॅटोच्या विक्री होत आहे. बाजारात टोमॅटोची आवक 30 ते 40 टक्क्यांनी घटली आहे. नागपूर येथे स्थानीक बाजारात ८0 रुपये किलोने टोमॅटो विकले जात होते. त्यामुळे त्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
आठवड्याभरापूर्वी बाजारात 25 रुपये प्रति किलोने विकले. सध्या बाजारात टोमॅटोच्या विक्री 50 रुपये प्रति किलोने झाली आहे. टोमॅटोच्या दरात थेट दुपटीने वाढ झाली परंतु शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने त्यांनी नाराज होऊन टोमॅटोचे पीक घेण्यास बंद केले. सर्वात जास्त टोमॅटोची आवक पुणे व ग्रामीण भागातून होत असते. तसेच इंधन दरवाढ, वाहतूक खर्च, वाढता मजूरीचा खर्च आणि वाढत असलेल्या तापमानामुळे टोमॅटोचे नुकसान होऊन उत्पादन कमी होत असून . अनेक शेतकऱ्यांनी परवडत नसल्याने उत्पादन घेण्याचे कमी केले आहे.
सद्यस्थितीला 50 रुपये प्रति किलोने टोमॅटो विक्री केले जात आहेत . ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पीक घेतले त्यांना चांगलाच फायदा झाला आहे आणि चांगले दर देखील मिळाले आहेत.दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळेही पिकांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना परवडत नसल्याने अंगावरच पिकाचे उत्पादन घ्यावे लागते त्यामुळे कर्जात वाढ होते.
परंतु किरकोळ बाजारात याचा फायदा घेऊन ग्राहकांची लुट केली जाते. आठवड्याभरापूर्वी किरकोळ बाजारात 20 रुपये प्रति किलोने विक्री केले जाणारे टोमॅटो सध्या 50 रुपये प्रति किलोने विक्री केले जात आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम