द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण भागात विविध साधीच्या आजारांनी डोके वर काढले असून ,नागरिकांमध्ये या आजारांविषयी धास्ती वाढली आहे. जिल्हाभरात डेंग्यू, चिकनगुनिया सारख्या रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्यामुळे खेडोपाडी डॉक्टरांकडे उपचार करून घेण्यासाठी गर्दी दिसून येत आहे.
यावर आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनी डास प्रतिबंधात्मक फवारणी तसेच आरोग्यसुविधा पुरवाव्यात अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत होणार्या बदलामुळे लहान मुले व मोठ्यांना तापासह इतर आजार होत आहेत. यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारी व खाजगी दवाखान्यातील ओपीडीत वाढ झाली आहे. ताप आणि खोकला असला तर काळजीपोटी कोरोना चाचणी करण्यावरही भर दिला जात आहे. सध्या शहरासह तालुक्यात थंडी-ताप, खोकला, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुन्या, पेशी कमी होणे अशा आजारांचे प्रमाण वाढते आहे. त्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने चिंतेत भर पडत आहे.
कोणता आजार आहे याचे निदान होण्यासाठी विविध तपासण्या करण्यासाठी गर्दी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सगळ्यांनीच काळजी घेणे गरजेचे आहे. घरगुती उपचार न करता डॉक्टरांपासून तपासून योग्य असे उपचार करणे गरजेचे असले तरी डासांचे निर्मूलन होण्यासाठी आरोग्य विभागाने तातडीने पाऊले उचलण्याची मागणी शेवटी आहेर यांनी केली आहे.
“सध्या आजारांचे प्रमाण वाढले असून त्यातील बरेचशे आजार हे डासांमुळे होत असल्याने डासनिर्मुलन होणे महत्वाचे आहे. त्यासाठी कोरडा दिवस पाळणे, मच्छरदाणीचा वापर करणे, सकस आहार घेणे, पाणी साचू न देणे अशा गोष्टी पाळणे महत्वाचे आहे. लहान मुलांना पाणी उकळून पाजावे, त्यांना बाहेरील अन्नपदार्थ देवू नयेत तसेच त्यांना गर्दीच्या ठिकाणी नेवू नये.”
– डॉ.प्रशांत निकम ,देवळा“डासांचे प्रमाण कमी होण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद यांनी फवारणी करावी. आरोग्य विभागाच्या वतीने कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले जावे. ग्रामीण भागातील जनतेला योग्य औषधोपचार मिळण्यासाठी घरोघरी भेटी देत व तपासण्या करत दिलासा द्यावा.”- केदा आहेर, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण)भारतीय जनता पक्ष
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम