द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : भारताचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांचा नुकताच हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि इतर महत्वपूर्ण अधिकाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला.
या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. बिपीन रावत यांच्या दुर्दैवी मृत्यूमागे घातपाताची शंका व्यक्त केली जात होती. मात्र या अपघाताच्या चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतर सारे स्पष्ट झाले आहे.
खराब हवामानामुळे हा हेलिकॉप्टर अपघात झाला आणि त्यात जनरल बिपीन रावत यांसह इतरांचा मृत्यू झाला. हे स्पष्ट झाले आहे. यात कोणताही घातपात, दुर्लक्ष वगैरे असे काहीही कारण नसल्याचे स्पष्ट झाले असल्याचे बोलले जात आहे.
जनरल बिपीन रावत यांच्या मृत्यूने भारताचे मोठे नुकसान झाले. यामुळे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला मोठा झटका बसला. याच कारणास्तव या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. ज्यातून आता सर्व स्पष्ट झाले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम