चाळीसगाव प्रतिनिधी : पावसाचा हाहाकार सध्या सर्वत्र दिसून येत आहे. तालुक्यातील पुरस्थिती गंभीर बनली आहे. काल पासून सुरू झालेल्या पावसाने साधारण तिनशे घरांमध्ये पाणी शिरल्याचा प्राथमिक माहिती आहे. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याकरीता मदतीसाठी राज्य (Sate) आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एनडीआरएफची (NDRF) टीम दाखल झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे दिली आहे.
जळगाव(jalgaon) जिल्ह्यातील चाळीसगावच्या काही भागांमध्ये 90 ते 150 मिली पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे चाळीसगावच्या नद्या व नाल्यांना पाणी वाढले आहे. परिस्थितीत चिंताजनक झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
आताच मिळालेल्या माहितीच्या आधारे साधारणपणे तिनशे घरांमध्ये पाणी शिरले आहे. या घटनेमध्ये एक व्यक्ती मृत पावल्याची नोंद आपल्याकडे आलेले आहे. त्याचप्रमाणे अनेक जनावरे ही वाहून गेल्याचे घटना समोर येत आहेत त्याचा शोध घेतला जात आहे. 30 जणांची टीम आपल्याकडे दाखल झालेली आहे, ती टीम सध्या घटनास्थळी पोहोचली आहे. सध्या मदत कार्य सुरू असून आगामी काळाचा अंदाज घेऊन मदतकार्य सुरू असल्याची माहिती जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी दिली आहे.
चाळीसगावमध्ये कालपासून झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर चाळीसगाव शहरात घुसलेल्या पुराच्या पाण्याचा जोर आणखीनच वाढला आहे. पुरामुळे शहरातील तब्बल तीन ते चार पूल पुराच्या पाण्याखाली आले आहेत. तसेच दुकानांच्या बेसमेंटमध्ये देखील दहा फुटांहून अधिक उंचीवर पाणी साचल्यामुळे संपूर्ण दुकानांमध्ये पाणी घुसले आहे. शहरातील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच दरड कोसळल्याची माहिती देखील समोर आली आहे. शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम