पिंपळगाव प्रतिनिधी : चापडगाव शिवारात जवळपास 200 एकर खाजगी क्षेत्रात नांदूर मध्यमेक्ष्वर धरणाचे पाणी आले. त्यामुळे शेतकर्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. धरणाचे गेट ओपन करून पाणी कमी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
मागील काही वर्षांपासून गावच्या शेतकर्यांच्या जवळपास 200 एकर खाजगी क्षेत्रात नांदूर मध्यमेक्ष्वर धरणाचे पाणी सातत्याने येत आहे. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत असून जमीनीची पोत खराब होते. परिणामी शेतकर्यांना आर्थिक हानी ची झळ सोसावी लागते. तरी शासनाने व इरिगेशन विभागाने याची त्वरित दखल घेऊन योग्य तो ऊपाय करावा, जेणेकरून शेतकरी बांधवांचे नुकसान होणार नाही, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नुकसान झालेले शेतकरी पुढील प्रमाणे –
विश्वनाथ दराडे, भाऊलाल सजन दराडे, शरद एकनाथ दराडे, दिलीप घुगे, मधुकर कांडेकर, सोमनाथ गिते, वाळीबा दराडे, देवराम मुरलीधर दराडे, विष्णू सुखदेव दराडे, मधुकर साहेबराव दराडे, रामेश्वर हांडे, संपत दराडे, शंकर दराडे, मनोहर दराडे, सोमनाथ उगले, अनिल दराडे, रमेश दराडे, उत्तम चौधरी, शरद चौधरी व इतर सर्व शेतकर्यांच्या 200 एकर खाजगी क्षेत्रात पाणी आले आहे. तरी त्वरित कारवाई करावी. अन्यथा उपोषण करण्यात येईल.
दरवर्षी पावसाळ्यात नांदूर मध्यमेश्वर धरणात वरील धरणातून पाणी सोडले. पाणी जास्त सोडल्यामुळे आणि धरणाचे गेट बंद असल्यामुळे धरण लगत असलेले चापडगाव येथील 200 ते 250 एकर खाजगी जमीन व पिके पाण्याखाली जात असून त्यावर काही उपाय योजना कराव्या. तसेच धरणाचे गेट उघडे करावे.
– अतुल सोपान सानप
संचालक -आरव फ्लेक्स प्रिंटिंग व ग्रामस्थ चापडगाव
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम