
देवळा प्रतिनिधी : चनकापूर व पुनद धरणातील सिंचन व बिगर सिंचन आवर्तन रविवारी (दि १०) रोजी सोडण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ राहुल आहेर यांनी दिली .गिरणा नदीला आवर्तनाचे पाणी सोडण्यात यावे ,अशी मागणी आ.डॉ.राहुल आहेर यांनी जिल्हाधिकारी गंगाधरण डी यांची गुरुवारी (दि ७) रोजी भेट घेऊन निवेदन सादर केले .

गिरणा नदीला आवर्तन सोडण्यात यावे, यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार डॉ आहेर यांनी बैठकीचे आयोजन केले होते . सदर बैठकीस गिरणा नदी खोरे प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील व मालेगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पवार उपस्थित होते.सदर बैठकीत जिल्हाधिकारी यांनी दि १० एप्रिल रोजी पाणी सोडण्याचे आश्वासन आ.डॉ.राहुल आहेर यांना दिले.
सदर बैठकीत आ.डॉ.राहुल आहेर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन देवळा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची व शेतीसाठी लागणाऱ्या पाणी टंचाई बाबत तसेच देवळा,कळवण व मालेगाव या तालुक्यातील जलवाहिनी म्हणून ओळखली जाणारी गिरणा नदी कोरडीठाक पडल्याने विहिरींनी तळ गाठला असून,नदी काठावरील अनेक पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत . तीव्र पाणीटंचाईमुळे जाणवरांना सुद्धा पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने तसेच शेतकरी वर्गाला मोठया प्रमाणात पाणीटंचाईला समोरे जावे लागत आहेत . पाण्याअभावी कांदा व इतर पिके करपू लागली आहेत . तसेच दि १६ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा असल्याने गडावर जाणाऱ्या भाविकांची देखील गर्दी वाढणार असल्याचे लक्षात घेऊन गिरणा नदीला तात्काळ पाणी सोडण्याची मागणी यावेळी आ.डॉ.राहुल आहेर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना अवगत करून दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दि १० एप्रिल रोजी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम