कोहलीचा राजीनामा मनाला चटका लावणारा की चटका देणारा?

0
38

द पॉईंट नाऊ ब्युरो : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने अचानकपणे कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याने सर्वांना मोठा झटका बसला आहे. मात्र विराटच्या राजीनाम्याच्या ट्विटनंतर BCCI ने ‘थँक यु’ म्हणून ट्विट केल्याने वेगवेगळ्या चर्चांना वाट मिळू लागली आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली नुकतीच भारताने दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका खेळली. ज्यात भारताला पराभव पत्करावा लागला. आणि त्यानंतर कर्णधार कोहलीने कर्णधारपदाचा अचानक तडकाफडकी राजीनामा दिल्याने BCCI आणि कर्णधार कोहलीमध्ये काहीही आलबेल नसल्याचेच दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.

याआधी कर्णधार कोहलीने टी-20 कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदावरून देखील पायउतार करण्यात आले. त्यानंतर BCCI ने आपण कोहलीला टी-20 संघाच्या कर्णधारपदी आपण कायम राहण्यास सांगितले. मात्र त्याने राजीनामा दिला. असे सांगितले होते. त्यावर कर्णधार कोहलीने आपल्याला BCCI ने आपल्याला असे काही सांगितले नाही म्हणून उत्तर दिले होते. यावरून BCCI आणि कर्णधार कोहली यांमध्ये आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले होते.

आता कर्णधार कोहलीने कसोटी संघाचा देखील राजीनामा दिला आहे. BCCI ने वन डे आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदी तर कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी रोहित शर्माची नियुक्ती केली होती. आता विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर कसोटी कर्णधार पदी रोहित शर्मा राहणार हे जवळपास निश्चित आहे.

मात्र विराटच्या अचानक दिलेल्या या राजीनाम्याने चाहत्यांच्या मनाला चटका लागला. तर अचानक दिलेल्या राजीनाम्याने कोहलीने BCCI ला चटका दिला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here