द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : देशभरात कोरोनाचे संकट आले होते सर्व पद्धतीने काळजी घेत असून देखील सोलापुरमध्ये एप्रिल महिन्यात कोरोनाने प्रवेश केला. त्यानंतर मात्र शहरतील तसेच ग्रामीण भागातील रुग्ण संख्या आणि मृत्यूदराचा आकडा चिंताजनक होता. राज्यसरकार विशेष लक्ष देत होते. केंद्रामार्फत केंद्रीय पथकाना पाचारण केले गेले. आता मात्र हा कोरोना परत जाण्याच्या वाटेवर आहे. जवळजवळ सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. तेच दुसऱ्या राज्यातील ११ जिल्ह्यामधून कोरोना हद्दपार झाला आहे.
लसीकरणापूर्वी जिल्ह्यांमधील मृत्यची संख्या चिंताजनक होती. तिसऱ्या लाटेत मात्र ह्यातून आणि कोरोनापासून दिलासा मिळाला. १६ महिन्यांपेक्षा अधिक काळ लादण्यात आलेले निर्बंध शिथिल झाले. सोलापूर शहरातील कोरोनाला रोखत असतानाच ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केला आणि बार्शी, पंढरपूर, करमाळा, माढा, माळशिरस या तालुक्यांच्या रुग्ण संख्येने प्रशासनाची चिंता वाढवली. प्रतिबंधक कायदे तोडले असता करण्यात येणाऱ्या कारवाई मधून तब्बल २० कोटींपर्यंत रक्कम वसूल झाली, म्हणजेच मोठ्या प्रमाणात लोकांनी नियमांचे उल्लंघन केले. निराशाजनक बाब अशी की, सतराशे बालकांनी घरातील कर्ताधर्ता गमावला. कोणाचे वडील तर कोणाची आई कोरोना महामारीची शिकार ठरली. आतापर्यंत शहर-ग्रामीणमधील सुमारे दोन लाख १९ हजार ७३१ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचा अहवाल आहे. त्यापैकी पाच हजार २३१ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आता रुग्णवाढ आणि मृत्यूदरही कमी होत आहे. लसीकरणामुळेच हे शक्य झाले आहे.
राज्यातील कोरोना मुक्त जिल्हे
राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमधून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून त्यामध्ये सातारा, धुळे, सांगली, नंदुरबार, जालना, लातूर, अकोला, उस्मानाबाद, बुलढाणा, गोंदिया व भंडारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात कोरोनाचे एकूण दीड हजार रुग्ण आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुके हे कोरोनामुक्त झाले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम