लातूर प्रतिनिधी : लातूर जिल्ह्यात एका गरीब कुटुंबातील व्यक्तीचे दोन तोळे सोन असलेली बॅग हरवली , कुटुंब चिंतेत होते , कारण सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असतांना दोन तोळे सोने सर्वसामान्यांना परवडणारे नव्हते. दरम्यान शहरातील एका केळी विक्रेत्याला ते सोने सापडले त्याने ते सोन मूळ मालकाच्या परत केले. यामुळे या विक्रेत्याच सर्वत्र कौतुक होत आहे.
चाकूर शहरातील रफिक मुजावर यांचे दोन तोळे सोन्याची बॅग गाडीवरून खाली पडली होती, त्याचा शोध घेतला पण सापडत नव्हते दरम्यान चाकूर इथं फळ विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रियाज बागवान यांना सोन्याची बॅग सापडली त्यांनी तशीच ती बॅग केळ्याच्या गाड्यावर लटकवून ठेवून ओळख पटवून देणाऱ्या व्यक्तीस ते घेऊन जाण्याचे आवाहन केले. तीन दिवसानंतर रफिक मुजावर यांच्या सोन्याची हरवलेले बॅग रियाज बागवान यांनी डॉ.वासेक देशमुख यांच्या उपस्थितीत संबंधितांकडे दिली.
फळ विक्रेत्याच्या या प्रामाणिक पणाचा सर्वत्र गौरव होत असून ,प्रत्यकाने नियत साफ ठेवली तर समाजात मोठं परिवर्तन होईल यात शंका नाही
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम