राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंबंधी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे विरोधात अनेक गुन्हा दाखल झाला आहे. अनेक विरोधकांकडून करते टीका केल्या जात आहेत. यातच अजित पवारांनी केतकी चितळे वर सूचक शब्दांत टीका केली आहे.
पत्रकारांशी बोलताना, अजित पवारांनी केतकीने केलेल्या खालच्या स्तरावरील केलेल्या टीकेवर निशाणा साधला. राज्यात सध्या जे काही चालले आहे, ते पटत नाही. राज्यासमोर आज महागाईचा प्रश्न गंभीर आहे; पण काही लोक माथी भडकवायचे काम करतात. त्यामुळे महाराष्ट्राचे वातावरण खराब होत आहे,’ अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
खासदार शरद पवार यांनी अनेक मंत्रीपदे भूषविली; पण कधीच कमरेखाली वार केले नाहीत. कधीच आपला तोल जाऊ दिला नाही. अशा थोर नेत्यावर काही विकृत लोक खालच्या पातळीवरची टीका करतात, हे बरोबर नाही,’ असेही अजित पवार पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले आहे.
पवारांनी साखर कारखान्यावरील प्रश्नांवर देखील चर्चा केली तसेच वाढत चाललेल्या महागाईमुळे आणि अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक चर्चा करण्यात आली. कोल्हापूर सोलापूर या ठिकाणी येणाऱ्या पुरासाठी उपायोजना सुरु केल्याचे सांगितले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
Best