कृषी कायदे रद्द ; मालेगाव संघर्ष समितीचा जल्लोष

0
145

सोमनाथ जगताप
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; मालेगाव येथे केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनाच्या मागणीला अनुसरून तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. त्यावर आनंद व्यक्त करण्यासाठी व शेतकरी आंदोलनात हुतात्म पत्करणाऱ्या शेतकरी बांधवांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मालेगाव तालुक्यातील शेतकरी व आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती च्यावतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला व शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी निखिल पवार यांनी सांगितले की, देशात शेतकऱ्यांच्या हिता विरुद्ध असलेले कायदे रद्द करावे या मागणीसाठी चौधरी राजेंद्र टीकेत यांच्या नेतृत्वखाली गेल्या एक वर्षापासून आंदोलन सुरू होते त्यात ६०० पेक्षा जास्त शेतकरी आंदोलन करतांना हुतात्मा झालेत. शेतकरी आंदोलनाची दखल घेत मा.सुप्रीम कोर्टाने कायदे स्थगित करत समीक्षा समिती नेमली होती. शेतकरी आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न देखील मोठ्या प्रमाणावर झाला. आज कायदे मागे घेऊन लोकभावनेचा या देशात आदर केला जातो, हा देश गांधीच्या विचारांवर आधारित लोकशाही जिवंत असल्याचे हे प्रतीक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या भावना समजून शेतकरी हिताचा स्वामीनाथण आयोगाच्या तरतुदी आधारित नवीन चांगला सर्व समावेक्षक कायदा लागू केला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

किसान सभेचे नेते व माजी उपनगराध्यक्ष प्रा के एन आहीरे यांनी आंदोलनाबाबत माहिती देत उत्तर प्रदेश, पंजाब येथील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नोट बंदी प्रमाणे अचानक मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. शेतकरी आंदोलनाचे राजकीय परिणाम लक्षात घेता कायदे मागे घेतले असून या आंदोलनात हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांची जबाबदारी सरकारने घ्यावी अशी मागणी केली.

प्रगतिशील शेतकरी चंद्रशेखर शेवाळे यांनी शेतकरयांना अनियमित हवामान व बाजारातील चढ उतार याचा सामना करावा लागतो त्याला आश्वासक व उत्पादन खर्च आधारित हमी देणारा भाव मिळावा यासाठी कायदा झाला पाहिजे अशी भूमिका मांडली. रविराज सोनार यांनी गुरूनानक जयंती निमित्त कृषी कायदे मागे घेतले हे आंदोलनाचे यश आहे असे विचार मांडले.

शेखर पगार सरकारच्या भूमिकेवर टीका केली व संसदेत कायदे रद्द करण्याबाबत ठराव मंजूर करून घेण्याची मागणी केली. किसान सभेचे नेते व माजी उपनगराध्यक्ष प्रा के एन आहीरे यांनी आंदोलनाबाबत माहिती दिली.

यावेळी आंदोलनात हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी समितीचे निखिल पवार, माजी नगराध्यक्ष दिपक भोसले, माजी उपनगराध्यक्ष तथा किसान सभेचे नेते प्रा. के एन अहिरे माजी उपमहापौर नरेंद्र सोनवणे, गांधीवादी कार्यकर्ते संजय जोशी, रविराज सोनार, या. ना. जाधव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील वडगे, कांदा उत्पादक राज्य संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, कुंदन चव्हाण, दीपक पाटील, सुशांत कुलकर्णी, शेखर पगार, प्रदीप पहाडे, कपिल डांगचे, संदीप शेवाळे, संपत शेवाळे, सुनील शेवाळे, नरेंद्र शेवाळे, दादासाहेब बापू शेवाळे, बाबाजी पवार, शेखर पगार, भूषण बच्छाव, प्रभाकर खैरनार, अमित खैरनार, श्याम खैरनार, नाना बच्छाव, निशांत बच्छाव, प्रकाश बच्छाव, किसान पाटील, अनिल पाटील, अनिल पवार, रोशन गांगुर्डे, संजय थोरात, मयूर पाटील आदी शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here