द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करत अचानक रंगणातून माघार घेतल्याने शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय सर्वत्र साजरा होत आहे. केंद्र सरकारने लादलेले कृषी कायदयांना शेतकऱ्यांचा विरोध होता. आणि रद्द केल्याबद्दल तमाम शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र सरकारचे आभार मानत आंदोलनात बलिदान केलेल्या शेतकऱ्यांच्या स्मृतींना वंदन करतो, असे प्रतिपादन किसान युवा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी केले.
आज सकाळी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केली, त्यानंतर किसान युवा क्रांती संघटनेच्या वतीने राज्यभर फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला, त्यावेळी विविध ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
‘इथून पुढच्या काळात सुद्धा शेतकरी चळवळ अशीच मजबूत केली जाईल’ असा विश्वास त्यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या आंदोत्सवावेळी सुरज अहिरे, संजय जगदाळे अनिल भामरे, चेतन गिरी, प्रकाश भदाने, देवेंद्र बच्छाव, खुषाल पवार, ऋषिकेश खैरणार, मोहित वाघ, प्रवीण गांगुर्डे, संजय खैरे, भूषण बागुल, डॉ.अंकुश जगदाळे, किरण मारवाळ,ओमकार बागुल, हेमंत बागुल बागुल, आदित्य सोनवणे, संजय सोनवणे, अनिल गोसावी, तात्याभाऊ भदाने, शशिकांत शेवाळे, शैलेश गोसावी, वैभव बागुल, रोहित शेवाळे, राहुल अहिरे, शुभम बागुल यांच्यासह मोठ्या संख्येने किसान युवा क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम