देवळा प्रतिनिधी : नगरपंचायत निवडणूक नंतर सोशल मीडियावर समर्थकांनी धुमाकूळ घातला असून यात विजयी उमेदवारांनी आनंदाच्या भरात मात्र पराभूत उमेदवारांना डीवचण्याचे काम केले, हिनवण्याचे काम केले आहे हे अतिशय दुर्दैवी असून लोकशाही देशात जय पराजय यत असतात मात्र उन्माद हा लोकशाहीत घातक आहे.
जिल्ह्यातील सर्व नगरपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात सर्व पक्षांनी ताकद लावली, मात्र अनेक दिगगजांना धक्का लागला अनेकांचे वर्चस्व संपुष्टात आले. नेते दिलदारपणे राजकारण खेळत असतात कार्यकर्ते मात्र खुनशी वृत्तीचा अवलंब करत असतात. पाच पन्नास मतांनी तुम्ही जिंकला असाल मात्र वैक्तिक चिखलफेक करून तुमचा उन्मादी विजय जनतेला मान्य नाही. जनता हे लक्षात ठेवत असते भविष्यात पुन्हा त्यांच्यासमोर जातांना कोणत्या तोंडाने जाणार सोशल मीडियावर केलेला उन्माद बद्दल त्यांना काय सांगणार याच भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे.
कार्यकर्त्यांच्या वागण्यामुळे तुमच्या नेत्यांची बदनामी होत असते, नेता चांगला असेल मात्र तुमच्या अर्धवट ,बालिश वागण्याने तुम्ही नेत्याला बदनामीच्या खाईत लोटत असतात याकडे गांभीर्याने कार्यकर्त्यांनी लक्ष देणे गरजेचं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम