‘कामगार’ प्रवासात ‘व्यापारी’ दुकानात

0
156

मुंबई प्रतिनिधी : मुंबईत कोरोना संक्रमण नियंत्रणात आल्यानंतर सरकारने व्यापारी वर्गांना दुकानं जास्त वेळ सुरू करण्यासाठी परवानगी दिली, व निर्बंध शिथील केले, माञ दुकानात काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाला लोकल ट्रेन प्रवास बंद असल्याने हे निर्बंध शिथिल करून उपयोग काय असा प्रश्न व्यापारी विचारतायत. व्यापाऱ्यांना जास्त वेळची परवानगी दिली मात्र ग्राहक नसल्याने व्यापारी मात्र जैसे थे परिस्थितीत आहेत.

कोरोनाने थैमान घातले होते, यात सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मुंबईत कोरोना लाटेचा प्रसार पूर्णपणे नियंञणात आल्यामुळे मुंबईत ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत निर्बंधातील अटी शिथील करण्यात आल्या आहेत. सर्व दुकान व आस्थापना आठवड्याचे सर्व दिवस दुकानं राञी 10 पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे सर्व होत असतांना दुकानात काम करणारे कर्मचारी हे लांब राहतात. त्यांना येण्याजण्यासाठी अडचनी येत असून प्रवासतच त्यांचा 3 तास वेळ जातो. याचा परिणाम व्यवसायांवर होतं आहे. त्यामुळे दुकाने उघडली तरी कर्मचाऱ्यांअभावी आम्हालाच सर्व कमी करावी लागत आहेत.

व्यापारी तसेच सर्वसामान्य लोकल चालू नसल्याने वैतागले आहेत. मागील दीड ते दोन वर्षांपासून सर्व सामान्यांसाठी लोकलची सेवा बंद आहे. तळहातावर पोट असलेल्या अनेकांची नोकरी गेलेली आहे. तर जे कर्मचारी कामाला जात आहेत. त्यांना तारेवरची कसरत करून कामाला यावे आणि जावे लागत नाही. यातील बहुतांश कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी त्यांच्यावर अशात कामावर न आल्यास घर कसे चालणार याची चिंता त्यांना सतावत आहे. तर कोरोनामुळे आधीच नागरिकांनी दुकानाकडे पाठ फिरवली आहे. कामगारांना पगार देताना दमछाक होत आहे. या सर्व गोष्ठी सरकारने लक्षात घ्यायला हव्यात आणि सर्व सामान्यांसाठी लोकल सुरू करावी अशी मागणी दुकान व्यावसायिक करत आहेत. यावरती लवकरच राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here