
सोमनाथ जगताप
देवळा : युवा मित्र संस्था सिन्नर, पाणी वापर संस्था व राजमाता जिजाऊ संस्था कनकापूर ता देवळा यांच्या संयुक्त विद्यमाने( दि ४ ) पासून कनकापूर गावात जल समृद्धी अभियाना अंतर्गत पाझर तलाव तसेच नदी नाल्यातून गाळ उपसा उपक्रमास सुरुवात झाली असून , या उपक्रमास गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती राजमाता जिजाऊ संस्थचे अध्यक्ष जगदीश शिंदे यांनी दिली .

देवळा तालुक्यातील अतिदुगर्म अशा कनकापूर गावांत गेल्या दोन वर्षांपासून राजमाता जिजाऊ संस्थेच्या मार्फत उन्हाळ्यात पाझर तलावातून गाळ उपसा व नदी नाले खोलीकरण उपक्रम राबविला जात आहे . यावर्षो दि ४ एप्रिल पासून या उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे . पहिल्या टप्प्यात येथील गंधर्व नाल्याचे खोलीकरण , दुसऱ्या टप्प्यात ब्राह्मण डोह मधील केटी वेअरचे खोलीकरणाचे काम करण्यात येऊन यातील गाळ उपसा करण्यात आला आहे .
आज दि २१ रोजी तिसऱ्या टप्प्यात पाणकाळ धरणातील गाळ उपश्याला सुरुवात करण्यात आली . आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून , शेतकरी गाळ वाहून नेत आहेत . या जलसमृद्धी अभियानामुळे धरण ,पाझर तलावातील पाणी साठ्यात वाढ होऊन ,पाणी टंचाईवर मात करणे शक्य होणार आहे . याठिकाणी शेतकऱ्यांचे नगदी पीक कांदा असून ,मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते मात्र ,फेब्रुवारी ,मार्च महिन्यात पाणी टंचाई जाणवत असल्याने पाण्याअभावी पिके करपू लागतात . परिणामी उत्पादनात घट होऊन आर्थिक फटका सहन करावा लागतो .
भविष्यात पाणी टंचाई भासू नये , म्ह्णून पाझर तलाव ,नदी नाल्यातून गाळ उपसा झाल्यास पाणी साठ्यात वाढ होऊन ,पाणी टंचाई दूर होऊ शकते . याकामी राज माता जिजाऊ संस्थेने पाठपूरवठा करून या उपक्रमाला सुरुवात केली व त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे . अशा प्रकारचा उपक्रम आजूबाजूच्या गावांत देखील राबविण्याची मागणी करण्यात आली आहे . याकामी संस्थेचे अध्यक्ष जगदीश शिंदे ,साहेबराव सावकार , शिवा बर्वे ,संजय बर्वे ,विजय जैन ,भाऊसाहेब शिंदे , रवींद्र बर्वे , सोमनाथ जगताप , विकास शिंदे आदींनी परिश्रम घेतले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम