द पॉईंट नाऊ ब्युरो : आज महाराष्ट्रात MPSC ची राज्यसेवा परीक्षा पार पडणार आहे. मात्र ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मोठे प्रश्न उभे राहिले आहेत.
राज्यभरात जवळपास 37 जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा होते आहे. मात्र परीक्षार्थी विद्यार्थी वर्गासमोर प्रवासाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यभरात एस. टी. बसचा संप सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवासाचे मोठे संकट उभे राहिले आहे.
परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना ठिकठिकाणी गाड्या बदलाव्या लागत आहेत. गर्दीतून वाट करून परीक्षा केंद्रांवर पोहोचणे विद्यार्थ्यांना अवघड झाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेचा तर अपव्यय होतोच आहे. पण त्याचसोबत मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम