एसटी कर्मचाऱ्यांच्या आडमुठेपणाला कोर्टाची चपराक

0
8

मुंबई प्रतिनिधी : एसटी कर्मचाऱ्यांचा आडमुठेपणा चांगलाच अंगाशी आला आहे. अनेक दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून एसटी महामंडळाचे (MSRTC) राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून एसटी कामगार चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे नागरिकांना मनस्ताप होत असून आज कोर्टाने देखील फटकारले आहे.

काही कर्मचारी कामावर दाखल देखील झाले आहेत. तर उर्वरित कामगार अजूनही कामावर रूजु झाले नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपावर मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी १५ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे. मात्र, तोपर्यंत कामावर रुजू न होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळ कारवाई करू शकते, असं न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं आहे. तसेच सरकारचा निर्णय धोरणात्मक असल्याचं निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवलंय. यामुळे सरकारला दिलासा तर कर्मचाऱ्याच्या आडमुठेपणाला चपराक मिळाली आहे.

न्यायालयाच्या या निर्णयाने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात असून आता पुढील १० दिवसांत कामावर हजर न झाल्यास कर्मचाऱ्यांवर अटळ असल्याचे स्पष्ट झाले आहे..


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here