एसटी कर्मचारी शिष्टमंडळात आज पुन्हा बैठक !

0
37

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु असून मंगळवारी परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळात सह्याद्री अतिथिगृहावर बैठक झाली. अंतरिम वाढ नेमकी किती असावी याचा प्रस्ताव शिष्टमंडळाने घ्यावा, असे परब यांनी स्पष्ट केले आहे.

विलीनीकरणाच्या मागणीसाठी नेमण्यात आलेल्या तीन सदस्यीय समितीला एसटीतील महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडूनही बुधवारी मागण्याचे लेखी निवेदन दिले. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीन करावे आणि शासकीय कर्मचाऱ्यांन प्रमाणे वेतन देण्याची मागणी यातून करण्यात आली.  यात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल, असे निवेदनातून स्पष्ट करण्यात आल्याचे संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बारणे यांनी सांगितलं आहे.

मंगळवारी झालेल्या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली असून बुधवारी सकाळी ११ वाजता पुन्हा बैठक घेण्यात आली . कर्मचाऱ्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही शिष्टमंडळा कडून सांगण्यात आलं आहे. आमदार गोपीनंद पडळकर सदाभाऊ खोत यांच्या सह काही एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ या बैठकीला हजर होते.

न्यायालयाने नेमलेल्या समितीसमोर सर्व विषय असल्याचा पुनरुच्चार परब यांनी बैठकीत केला.  समितीचा अहवाल मान्य केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केल. कर्मचाऱ्यांचा वेतन वाढी साठी विचार विनिमय करून निर्णय घेण्यात येतील. एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्याची हमी राज्य सरकार घेईल. त्याबाबतचा प्रस्ताव मुखमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर ठेवला जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबण्याची कारवाई सुरूच असून ही संख्या तीन हजारांपार गेली आहे. मंगळवारी ८५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असून ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे महामंडळाने आधीच स्पष्ट केलं होत. मात्र राज्यात दिवसभरात विविध भागातून २३६ बस सुटल्या ची माहिती महामंडळे दिली आहे .

 

हे ही वाचा : धाराशिव संचलित ‘वसाका’ चा गळीत हंगामाचा शुभारंभ

धाराशिव संचलित ‘वसाका’ चा गळीत हंगामाचा शुभारंभ

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; धाराशिव संचलित वसंत दादा पाटील सहकारी साखर कारखान्याचा ३६ वा गळती हंगामाचा शुभारंभ (दि २१) रोजी धाराशिव उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी कारखान्याचे कर्मचारी देविदास शेवाळे ,हिरामन देवरे यांच्या हस्ते सपत्नीक गव्हान व काटा पुजन करण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यावेळी म्हणाले की, करारानुसार ठरल्याप्रमाणे कामगारांचे थकीत वेतन देण्यासाठी आपण बांधील असून, कारखान्याच्या चालू गळीत हंगामासाठी सर्वच जुन्या व नव्या कामगारांची मोलाची साथ अपेक्षित आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here