पावसाळ्यापूर्वी आसाममध्ये आलेल्या पुरामुळे लोकांची अवस्था बिकट झाली आहे. आपात्कालीन पुरामुळे एका लहान मुलासह तिघांना जीव गमवावा लागला आहे. या आपत्तीत आतापर्यंत 202 घरांचे नुकसान झाले आहे. राज्यात 18 मे पर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पूरग्रस्त भागात मदतकार्य सुरू असून लष्कर, निमलष्करी दल, एसडीआरएफ, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवांनी बचाव कार्य केले आहे. चक्रीवादळापासून आसाममध्ये सतत पाऊस पडत आहे.10321.44 हेक्टर शेतजमीन पुरात बुडाली आहे.हाफलांग भागात मुसळधार पावसाने रस्त्याचा काही भाग वाहून गेला आहे. होजई, लखीमपूर आणि नागाव जिल्ह्यातील रस्ते, पूल आणि कालवे पाण्याखाली गेले आहेत.
शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने 12 गावांमध्ये दरड कोसळून भूस्खलनामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. आपत्तीत आतापर्यंत 202 घरांचे नुकसान झाले आहे. तर रेल्वे रुळांचे नुकसान झाले आहे. भूस्खलनात रेल्वेचा पूल वाहून गेला आहे. रेल्वेच्या पूलाचा भाग हवेत तरंगताना दिसत आहे. रेल्वेचा संपर्क तुटल्यामुळे बचावकार्य करण्यात अनेक अडथळे येत आहेत.
रेल्वे रुळावर पाणी साचल्याने असंख्य प्रवासी रेल्वेत अडकून राहिले आहेत. तर त्यांना मदतीसाठी हवाईदल कार्यरत आहे. डोंगराळ भागातही दळणवळण सेवेवर परिणाम झाला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम