द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; आज आघाडी सरकारने पुन्हा आपले अपयश सिद्ध केले असून, सरकार मधील समन्वय पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. रात्री उशिरा विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द झाल्याचे msg सर्वत्र गेले, व गोंधळ उडाला. उद्या व परवा होणारी परीक्षा अचानक रद्द करण्यात आली.
विद्यार्थ्यांचा खर्च कोण देणार ?
विद्यार्थी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात गेल्याने त्यांना आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणात सोसावा लागणार आहे. गरीब कुटुंबातील मजुरी करून विद्यार्थी परीक्षा केंद्रापर्यंत पोहचले मात्र सरकारच्या आडमुठ्या धोरणाने विद्यार्थ्यांना चांगलाच फटका बसला आहे.
उद्या होणारी आरोग्य सेवेची परीक्षा ही,विद्यार्थ्यांनी केलेल्या हॉलतिकीटचा तक्रारीमुळे रद्द झालेली आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी होत्या. हॉलतिकीत देखील ब्लॅक आलेले होते.
विद्यार्थ्यांना मनस्ताप
विद्यार्थ्यांना रात्री उशिरा msg आल्याने विद्यार्थी गोंधळात पडले, त्यांना उशिरा मनस्ताप सोसावा लागला. मीडिया मध्ये बातम्या आल्यावर विद्यार्थ्यांच्या जीवात जीव आला. सरकारने आधीच हा निर्णय घेतला असता तर इतका गोंधळ उडाला नसता.
बच्चू कडू यांनी मात्र परीक्षा रद्द केल्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले यामुळे सरकार मधील समनव्य चव्हाट्यावर आला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम