पंडीत मसणे(ठाणे प्रतिनिधी)
यापूर्वी ‘दिघे साहेब.. तुम्ही परत या’ व ‘आनंद आश्रमाचे महत्त्व कमी करु नका’.. अशा शिर्षकानुसार लेखन करून स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे.
पुन्हा एकदा, “आठवणीतले ..स्व. आनंद दिघे साहेब” या लिखाणाच्या माध्यमातून दृष्टीक्षेप टाकत आहे. सर्वप्रथम संपूर्ण ठाणे जिल्हा व सध्याचे पालघर दोन्ही अशा दोन्ही जिल्ह्याचे नेतृत्व करणारे म्हणजेच शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून अनेक वर्षे धुरा सांभाळली या स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या 20 व्या स्मृती दिनानिमित्त सर्वप्रथम.. भावपूर्ण आदरांजली.
दिघे साहेबांचे 26 ऑगस्ट 2001 मध्ये अपघाती निधन झाले. या निधनानंतर संपूर्ण ठाणे-पालघर जिल्हा पोरका झाला. साहेब सर्वांना सोडून पोरकं करून निघून गेले असलेतरी साहेबांनी केलेले समाजसेवेतील कार्य, पक्ष संघटना योगदान, तळागाळातील जनतेला दिलेला आधार, आजही आनंद भक्त व शिवसैनिक, कार्यकर्ते अशा अनेकांच्या आठवणीत, स्मरणात घर करून आहेत. साहेबांचा ग्रामीण भागातील असलेला उत्साहदायक संचार आणि गावाकडील शाखांवर व मर्द मावळयांवर असलेले प्रेम आजही.. सर्वांना आठवणींनी खुणावतात..!
दिघे.. साहेबांच्या भेटीसाठी व दर्शनासाठी भुके असलेला शिवसैनिक आतूरतेने वाट पहात असे. साहेबांची शहर, गांव- खेड्यापाड्यातील भेटीची असलेली तळमळ आणि समाज सेवेसाठी असलेली कामाची, कार्याची उत्साहाने असलेली मदत हि प्रत्येकाच्या आठवणीत आहे. साहेबांचे कणखर.. नेतृत्व आणि त्यातच असलेले प्रेम, जिवाळाही सर्वांना आदरणीय वाटत असे.
दिघे साहेबांच्या.. ताळमित घडलेला व जिवापाड प्रेम करणारा आनंद भक्त, शिवसैनिक, कार्यकर्ता यांचे आजही..साहेबांच्या आठवणीने डोळे पाणावतात.. घरात, शाखेत, कार्यालयात असलेल्या साहेबांच्या प्रतिमेस तसेच टेंभी नाक्यावरील आनंदआश्रमाकडे ..एकटक पहात स्मरण करून व नतमस्तक होत आहेत.
साहेबांचा गजबजून भरणारा ‘आनंद दरबार’ हा सर्वांना आधार ठरायचा..होणारी गोरगरिबांची कामे हा चेहऱ्यावरचा ‘आनंद’ असायचा..! तळागाळातील जनता, समाजपयोगी मदतीसाठी साहेबांची.. असलेली ओढ..हि सर्वांना प्रेरणादायी ठरत असे. साहेबांनी आपल्या कारकिर्दीत दिवस-रात्र पक्ष संघटन जबाबदारी कार्याबरोबरच इतर समाज सेवेचा अंगिकारलेला वसा कधी मोडला नाही. म्हणूनच आठवणीतले.. व्यक्तीमत्व म्हणून..
दिघे साहेब सर्वाच्या ह्दयात कायम असणार आहेत.
आज बघता.. बघता साहेबांच्या स्मृतीची वीस वर्षे सरली.. तरीही साहेबांचा आठवणीत असलेला आनंद भक्त, शिवसैनिक, कार्यकर्ता हा आजही साहेबांच्या आठवणीने प्रेरीत राहून समाजकार्य करीत आहे.
साहेबांनी आपल्या कारकिर्दीत..गोरगरीब जनतेला दिलेला आधार, शिवसैनिकांमध्ये निर्माण केलेले नवचैतन्य वातावरण, उत्साह, पक्ष संघटनेची आस्था, काम करण्याची क्षमता, मांडलेली भुमिका हे कदापी जिल्ह्यातील खरा आनंद भक्त, शिवसैनिक, कार्यकर्ता कधीच विसरू शकत नाही.. यात शंकाच नाही.. म्हणूनच आठवणीतले..स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांची ..आठवण अखेरच्या घटकापर्यंत कायमरूपी ‘अमर’ असणार आहे. दिघे साहेब आज आपल्यात नसले तरी त्यांनी केलेले कार्य कायमच प्रेरणादायी ठरणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम