द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार तर्फे येत्या सोमवारी महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली आहे.
यादरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचं आवाहन महाविकास आघाडी सरकार तर्फे करण्यात आलं आहे.
लखीमपूर इथल्या घटनेत नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. याप्रकरणी सर्व विरोधी पक्षांनी भाजपावर निशाणा साधत निषेध व्यक्त केला आहे.
लखीमपूर इथल्या हिंसाचारावर बोट ठेवत सर्व विरोधी पक्षांनी यास भाजपला जबाबदार धरत या महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे.
त्यामुळे येत्या आज रोजी महाराष्ट्र बंद करण्यात येणार आहे. आज या बंद ला कुठे आणि कितपत पाठिंबा भेटतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम