असे कृत्य करून पाकिस्तानचे भारतावर उपकार?

0
183

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : पाकिस्तानच्या जलक्षेत्रात बेकायदेशीरपणे मासेमारी केल्याप्रकरणी २० भारतीय मच्छिमारांची चार वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर रविवारी पाकिस्तानच्या लांडी जिल्हा कारागृहातून सुटका करण्यात आली. सुटका करण्यात आलेल्या मच्छिमारांना सोमवारी वाघा सीमेवर आणून भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

सर्वाधिक गुजरातचे मच्छिमार
पाकिस्तानच्या लांधी कारागृहाचे अधीक्षक इर्शाद शाह यांनी सांगितले की, भारतीय अधिकाऱ्यांनी मच्छिमारांच्या राष्ट्रीयत्वाची पुष्टी केल्यानंतर त्यांना सदिच्छा म्हणून सोडण्यात आले. सुटका करण्यात आलेले बहुतांश मच्छिमार हे गुजरातमधील आहेत. तुरुंग अधीक्षक इर्शाद शाह म्हणाले, “या मच्छिमारांनी चार वर्षे तुरुंगात काढली होती आणि आमच्या सरकारने सदिच्छा दाखवून आज त्यांची सुटका केली आहे.”

सध्या लांधी कारागृहात ५८८ भारतीय बंद आहेत
ना-नफा सामाजिक कल्याणकारी संस्था ईधी ट्रस्ट फाऊंडेशनने मच्छिमारांना लाहोरमधील वाघा सीमेवर नेण्याची व्यवस्था केली, तेथून त्यांना सोमवारी भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपवले जाईल. इर्शाद शाह म्हणाले, “आम्ही सुटका झालेल्या मच्छिमारांना ईधी फाऊंडेशनकडे सुपूर्द केले आहे जे त्यांचा सर्व प्रवास आणि इतर खर्च उचलत आहे. अल्लामा इक्बाल एक्सप्रेस ट्रेनने ते लाहोरला जातील. अधिकाऱ्याने सांगितले की, ५८८ भारतीय नागरिक अजूनही लांधी तुरुंगात बंद आहेत, त्यापैकी बहुतांश मच्छिमार आहेत. पाकिस्तान नेहमी काही न काही कुरापती काढत असतो भारतीय मच्छिमारांना कैद करून पाकिस्तान नेहमीच भारताला डिवचत असतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here