असंघटित नेतृत्वामुळे बागलाणचा विकास खुंटला – रामचंद्र बापू

0
42

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; कोणताही विकास करायचा असेल तर संघटन महत्त्वाचे असून आळीपाळीच्या राजकारणामुळे व असंघटित पणामुळे वागण्याचा विकास खुंटला असे मत शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू पाटील यांनी व्यक्त केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त सटाणा येथे आयोजित बागलाण काल आज आणि उद्या या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते.

यावेळी बागलाणचा कसा विकास व्हावा म्हणून भिकन पाटील ,पंडित धर्मा पाटील ,नारायण सोनवणे ही मोठी माणसं एका ध्येयाने प्रेरित होत होती. त्यावेळी मतभेद बाजूला करून बागलाण च्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी पुढे आली. पण आज मात्र हे चित्र उलटे झाले आहे. बागलाण चा विकास होण्यासाठी संघटन नाही आणि आळीच्या राजकारणामुळे असंघटित बागलाण विकासापासून दूर लोटला जात आहे. अशी खंत रामचंद्र पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी भाऊसाहेब आहीरे यांनी बागलाणमध्ये विकासाला चालना मिळते. पण ती अखंडित होत जाते. माणसांच्या असल्या नसल्या वरून विचार करून चालणार नाही तर जी आपली आहेत ती नाती जपत कर्म केले पाहिजे.छत्रपती शिवराय भगवान श्रीकृष्ण तुकडोजी महाराज यांनी कर्मातून राज्याचे जनतेचे कल्याण व्हावे हाच उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून कार्य केले. म्हणून महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करण्याची आवश्यकता आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. ग्राम विकासाला चालना देताना अगोदर आपला सहभाग व जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे बागलाण मध्ये आदर्श गाव योजना राबवल्या गेल्या परंतु आदर्श गाव निर्मितीचा वसा व वारसा प्रत्येकाने जपावा अशी अपेक्षा ग्राम विकासाचे शिल्पकार केदा बापू काकुळते यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक थोरात सहकाराचे तज्ञ कुबेर जाधव ,लालचंद सोनवणे ,ॲड सरोज चंद्रात्रे ,यांनी सकारात्मक विचारातून माणूस प्रेरित होतो. जेव्हा अशी माणसं चांगला विचार करु लागतील व आदर्श तयार होतील तेव्हा विकासाला खरी दिशा मिळेल .म्हणून हात नको मनं जोडा मनामनातंल अंतर तोडा चा संदेश व माणूस बनण्याच्या संकल्प देणाऱ्या गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या अशा या सकारात्मक विचारांना पाठिंबा दिला तर नव्या संकल्पना आकार घेतील आणि बागलाणची प्रतिमा अधिक उजळेल बागलाण प्रांतची होणारी प्रगती पुन्हा अधिक गतीने होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

चांगल्या विचारांना पाठिंबा दिला तर नव्या संकल्पना आकार घेतील असे गौरवोद्गार यावेळी त्यांनी काढले या परिसंवादाला केदा काकुळते ,अशोक थोरात ,रामचंद्र पाटील केदा भामरे ,अँड सोमदत मुजंवाड पंकज पवार ,वैभव गांगुर्डे ,केदा भामरे, सी आर पाटील, राजेंद्र निकम ,किशोर भांगडिया ,आत्माराम भामरे, आनंदा महाले, लालचंद सोनवणे, भाऊसाहेब आहिरे, केशव इंगळे ,रघुनाथ सूर्यवंशी ,अँड.सरोज चंद्रात्रे, वंदना भामरे अपर्णा वेलणकर ,विद्या सोनवणे ,योगेश पवार,राजेंद्र सोनवणे, मोठा भाऊ अहिरे ,श्री कोठावदे ,रामकृष्ण शेवाळे, किरण दशमुखे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर शेवाळे यांनी केले तर स्वागत किरण देशमुख यांनी गिरणा गौरव प्रतिष्ठान च्या वतीने परिसंवादात सहभागी झालेल्यांचे स्वागत केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here