द पॉईंट नाऊ ब्युरो : औरंगाबाद (संभाजीनगर) येथील शिवपूर गावात एका शेतकऱ्याने अपहरणकर्त्याला पकडण्यासाठी आपल्या शेतातील संपूर्ण ऊसच जाळून टाकल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवपूर येथे एका ऊसतोड कामगाराच्या मुलीचे अपहरण करण्यात आले. हा अपहरणकर्ता थेट ऊसाच्या शेतात जाऊन लपला. हे पाहून बाबासाहेब दुबिले या शेतकऱ्याने शेतातील उभ्या ऊसालाच आग लावली. यामुळे अपहरणकर्ता अलगद सापडला.
ऊसतोड कामगारांची मुले गाडीत झोपलेली होती. त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न पहाटे 3 वाजेच्या सुमारास अपहरणकर्त्याने केला. परंतु मुले रडू लागल्याच्या आवाजाने ऊसतोड कामगार जागे होऊन गाडीकडे धावले. मात्र हा अपहरणकर्ता ऊसाच्या शेतात लपल्याने, शेतकऱ्याने सर्व ऊसालाच आग लावली. त्यामुळे अपहरण करणारा पकडला गेला आणि त्याचे हातपाय बांधून त्याला कामगारांनी पोलिसांच्या हवाली केले. विष्णू उत्तम गायकवाड असे आरोपीचे नाव आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम