मुंबई:
राज्यातील महाविकास आघाडी विधानसभेतील बहुमत गमावण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र सध्या आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे जवळ जवळ ४० आमदारांनी बंडखोरी केली असून अशा परिस्थितीत शिवसेनेकडून विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस केली जाऊ शकते. राज्यातील सध्याच्या सत्तासंघर्षात सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश फार महत्त्वाचे ठरणार आहेत. शिवसेनेकडे सध्याच्या परिस्थितीत राज्यपालांकडे शिफारस करण्याचा पर्याय आहे. तर राज्यपाल विधानसभा विसर्जित करण्याच्या आधी अन्य पक्षाला सरकार स्थापन करण्याची संधी देऊ शकतात.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम