मुंबई :
बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्यासाठी जबरदस्ती नेलेले उस्मानाबादचे शिवसेना आमदार कैलास पाटील आणि अकोल्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी स्वतःची सुटका करुन घेतली. त्यानंतर वर्षा बंगल्याबाहेर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांना आपल्या थरारक सुटकेचा प्रवास कथन करण्यास सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे तुम्ही आग्य्राहून सुटका करुन घेतलीत, तुम्हाला कशाप्रकारे गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला, कसं नीच राजकारण सुरु आहे ते सांगावं, अशी विनंती राऊतांनी केली. “ज्या शिवसेनेने मला जिल्हाप्रमुख, आमदार केलं, त्यांच्याशी प्रतारणा करणं मला पटलं नाही” अशा भावना यावेळी कैलास पाटलांनी व्यक्त केल्या.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम