ढेपाळलेली सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांना पुन्हा देशोधडीला लावणार का ? ; 2 ते 3 रुपये कि. विकला जातोय कांदा

0
33

नाशिक प्रतिनिधी : कृषी प्रधान देशात शेतकरी देशोधडीला लागलेला असतांना पुढारी व यंत्रणा मात्र कागदी घोडे नाचवत आहेत. शेती संबंधित सरकारी नियोजन ठोस नसल्याने अनेक संकटांना शेतकरी सामोरे जातोय. आज नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. व्यापार लॉबी पुढे शेतकरी हवालदिल झाला आहे. लाल कांदा हा 400 ते 500 रुपये क्विंटलने विकला जातोय तर उन्हाळी कांदा 600 ते 700 रुपये क्विंटल दर मिळाला आहे.

शेती करत असतांना अवकाळी पावसाने झोडपले निसर्गाची साथ नाही त्यात सरकारी अधिकारी AC त बसून पिकपाहनी लावणारे हलगर्जी कर्मचारी यांच्या बेहिशोबी आकडेवारीने सरकारी अंदाज चुकत असतात, व त्याचा थेट फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत असतो. अनेक अधिकारी हे खोटी आकडेवारी देत असल्याने आयात निर्यात धोरणावर याचा थेट परिणाम होत असतो. सरकारी अनास्था व राजकीय उदासीनता मतांचे बेगडी राजकारण यामुळे शेतकऱ्यांचे वाटोळे होत असते. सरकारी अधिकारी कुना शेतकर्यांचेच पोर असतात मात्र यांना आपल्या कर्तव्याचा विसर पडलेला असतो हे आपल्या शेतीला, आईला विसरलेले असतात. प्रत्येक शेतकरी पुत्राने परिस्थितीची जाण ठेवली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल त्यांना न्याय मिळेल हे देखील सत्य आहे.

व्यापारी शेतकऱ्यांना लुटताय ?
व्यापारी वर्ग हा नेहमीच शेतकऱ्यांची पिळवणूक करत असल्याचे चित्र आहे अनेकवेळा समोर आले आहे. अनेक ठिकाणी बाजार समितीचे देखील व्यापाऱ्यांवर लक्ष नसल्याने व्यापारी मुजोर वागत असतात, जो शेतकरी व्यापारी विरोधात बोलेल त्याच्या मालाला व्यापारी भाव देणार नाही म्हणून शेतकरी आवाज उठवत नाही , शेतकरी एक प्रकारे गुलाम होत असतो. व्यापाऱ्यांचा कोटा भरल्यास अगदी कांद्यावर बोली लावतांना 1,2 शब्दात संपवत असतात. मजबुरी म्हणून शेतकऱ्यांना आपला माल विकावा लागतो या मुजोरपणाला व्यसन घालणे महत्त्वाचे आहे. नुकतेच सटाणा व देवळा बाजार समितीत एकच कांद्याला मोठया तफावतीचा सामना करत दर मिळाला यावरून व्यापाऱ्यांची खेळी समोर आली आहे.

बियाणे खत, खाद्यात शेतकरी फसला

कांद्याला यावर्षी सुरवातीपासूनच ग्रहण लागले आहे शेतकरी कांदे बियाणे मर झाल्याने टाईम कोलमडला व त्याचा फटका आता दिसतोय, लाल कांदा अजूनही मार्केट मध्ये येत असल्याने उन्हाळी कांद्याची परिस्थिती बिकट झाली आहे. एकदम दर का घसरले याचा विचार शेतकऱ्यांनि देखील करावा. बियाणे महागडे त्यात कांदे लागवड एक टप्प्यात आल्याने मजूरास दुपटीने दर दिला गेला. वेळेवर खाद्य नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी ब्लॅक मध्ये अधिकचा दर देऊन खाद्य खरेदी केले. ह्या सर्व भयंकर परिस्थितीचा टप्पा पार करून शेतकऱ्यांना आता सरकारी ढिसाळ नियोजनाने भाव कोसळून कंबरडे मोडले आहे.

मुजोर मजूर आणि लहरी निसर्गाच्या विळख्यातून कसाबसा वाचवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने आम्ही कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालो आहोत.
अजूनही आस्मानी संकट टळलेले नसताना आता कांदा दर खालावल्याने सुलतानी संकटाचा देखील कांदा उत्पादकांना सामना करावा लागत आहे.बसरकारने लवकरात लवकर कांदा भावाढीसाठी प्रयत्न करून आम्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
– शाबान पठाण , कांदा उत्पादक शेतकरी ओतूर

शाबान पठाण , कांदा उत्पादक शेतकरी ओतूर

खताच्या वाढलेल्या अव्वाच्या सव्वा किंमती, मजुरी त्यात अतिवृष्टी, वीजेची समस्या अनेक अडचणीतुन पिकलेल्या मालाला दोन तीन रुपये किलो भाव मिळतो आहे सरकारने शेतकर्याचा विचार करावा नुसतं नावाला कृषी प्रधान देश म्हटला जातो की काय या देशात फक्त खाणार्याचाच विचार होतो.पिकवणार्याचाही विचार व्हायला हवा.जो तो उठुन शेतकर्याचाच मुळावर उठला की काय आहि शंका येतेय.
– भगवान जाधव , कांदा उत्पादक शेतकरी

भगवान जाधव, कांदा उत्पादक शेतकरी

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम