कृषी प्रतिनीधी : शेतकरी राजाची सद्या लगबग सुरू झाली असून जगाला पुन्हा अन्न देण्यासाठी कष्टकरी शेतकऱ्यांनी कंबर कसले आहे. सध्या खरीपपूर्व मशागतीची कामे देखील अंतिम टप्प्यात असून. वर्षभरात केवळ खरिपाच्या तोंडावर शेती मशागतीचे काम करुन शेतकरी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करत असतात. यंदा तर वेळेपूर्वीच मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला गेल्याने शेतकऱ्यांनी ही कामे वेळेपूर्वीच उरकती घेतलेली आहेत.
बियाणांचे नियोजन, खताचे काय ?
राज्यात यंदा 1 लाख 47 हजार हेक्टरावर खरिपाची पेरणी होईल असा अंदाज आहे. त्यानुसार 17.95 लाख क्विंटल बियाणांचा आवश्यकता आहे. असे असताना 18 लाख क्विंटलचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र बियाणांची चिंता नसली तरी खताबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. रासायनिक खताचा पुरवठा हा आयातीवरच अवलंबून आहे. त्यामुळे खताच्या किंमतीमध्ये वाढ होणार नसली तरी पुरवठा होणार की नाही याबाबत साशंका उपस्थित होत आहे. गेल्या हंगामात खतांमुळे मोठे आर्थिक नुकसान शेतकरयांना सोसावे लागले आहे.
शेतकरी नेहमी चिंतेत असतो मात्र बियाणांबाबत शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही मात्र रासायनिक खताचा वापर हा काळजीपूर्वकच करावा लागणार असल्याचे संकेत कृषी विभागाने दिले आहेत. शिवाय सर्वकाही पोषक वातावरण असले तरी शेतकऱ्यांनी 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये असा सल्ला दिला आहे. त्यामुळे शेतशिवारातली कामे तर पूर्ण झाली आहेत शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे ती वेळेत पाऊस पडण्याची.
प्रत्यक शेतकऱ्यांचे अर्थकारण हे खरीप हंगामावरच अवलंबून आहे. खरीप हंगामात सोयाबीन हे हुकमी पीक असून यंदा वेळेत पाऊस झाला तर राज्यात तब्बल 1 लाख 46 हजार हेक्टरावर पेरा होणार असल्याचा अंदाज आहे. गतवर्षी 1 लाख 43 हजार हेक्टरावर पेरणी झाली होती. पण निसर्गाच्या लहरीपणामुळे अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडले नव्हते. गतवर्षी झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी यंदाही सर्वकश प्रय़त्न केले आहेत. मान्सून वेळेत दाखल झाला तर शेतकऱ्यांनी केलेला निर्धार य़शस्वी ठरणार आहे. गतवर्षीपेक्षा यंदा जास्तीचा पेरा असण्याची शक्यता आहे
18 लाख क्विंटल बियाणे
खरीप हंगामासाठी कृषी विभागाने 18 लाख क्विटंल बियाणे पुरवण्याचे नियोजन असल्याचे सांगितले आहे. हे बियाणे खासगी असून एवढ्या मूबलक प्रमाणात पुरवठा झाल्यास टंचाई भासणार नसल्याचे सांगितले. विक्रेत्यांनी कृत्रिम टंचाई निर्माण करु नये म्हणून कृषी विभागाने भरारी पथकांची नेमणूकही करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना वेळेत आणि कमी किंमतीमध्ये बियाणे उपलब्ध करुन देण्यावर प्रत्येकाचाच भऱ राहिलेला आहे. गतवर्षीच्या तुलनेत 3 ते 4 लाख हेक्टराने क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज आहे.
कापूस बियाणांवरील निर्बंध कायम, पेऱ्यावर परिणाम
सध्या सोयाबीन व इतर पिकांच्या बियाणांची खरेदी केली जात असली तरी कापूस बियाणे मात्र बाजारात मिळत नाही अशी परिस्थिती आहे, कारण कृषी विभागाने 1 जून नंतर कापसाचे बियाणे विक्रीची परवानगी कृषी सेवा केंद्रांना दिली आहे. वेळेपूर्वीच कापसाची लागवड केली तर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढतो हे दरवर्षीच्या निरिक्षणातून निदर्शनास आले आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यावर जमिनीचा पोत तर खराब होतोच पण इतर पिकांच्या उत्पादनावरही परिणाम जाणवतो. त्यामुळे कृषी विभागाने 1 जून पासूनच कापूस बियाणे विक्रीची पवागनी दिली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम